Take a fresh look at your lifestyle.

Delhi-Mumbai Expressway : दिल्ली ते जयपूर 3 तासांत.. पण ‘या’ दिवशी होणार प्रवासाला सुरुवात, पहा सर्वात मोठ्या एक्स्प्रेस-वे ची खासियत..

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बहुप्रतिक्षित दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या भागाचे उद्घाटन केलं. 1,386-km एक्सप्रेस – वेचा पहिला टप्पा 247 किमी लांबीचा आहे. दिल्ली – दौसा – लालसोट दरम्यानच्या या टप्प्यामुळे दिल्ली ते जयपूरपर्यंतचा प्रवास सुलभ होणार आहे. दिल्ली ते जयपूर हा पाच तासांचा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होणार आहे.

हा एक्सप्रेस – वे पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई प्रवासाचा वेळ 24 तासांवरून 12 तासांवर येणार आहे. याशिवाय एक्सप्रेस – वे दरम्यान येणाऱ्या शहरांमधील अंतरही सोपं होणार आहे.

चला जाणून घेऊया या एक्स्प्रेस – वेबद्दल.. तसेच हा एक्सप्रेस – वे बनवण्यासाठी किती खर्च आला ? काय आहे या एक्सप्रेस – वेची खासियत ? सर्वसामान्यांसाठी हा एक्सप्रेस – वे कधी होणार खुला ? दिल्ली ते मुंबई हा संपूर्ण एक्सप्रेस – वे होणार कधी पूर्ण ?

या एक्सप्रेस-वे साठी किती येणार खर्च..

9 मार्च 2019 रोजी दिल्ली – मुंबई द्रुतगती महामार्गाची पायाभरणी करण्यात आली. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा 246 किमीचा दिल्ली – दौसा – लालसोट पर्यंतचा टप्पा 12,150 कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. हा टप्पा सुरू झाल्यामुळे दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ 5 तासांवरून 3.5 तासांवर येईल. याशिवाय संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाल्याचा दावाही सरकारने केला आहे. संपूर्ण प्रकल्पाबद्दल बोलायचं झालं तर, 1,386 किलोमीटर लांबीचा एक्स्प्रेस वे 98,000 कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे.

काय आहे या एक्सप्रेस – वेची खासियत ?

दिल्ली – मुंबई एक्सप्रेस – वे हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस – वे आहे. हे राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल. हा एक्सप्रेसवे 93 PM गती शक्ती टर्मिनल, 13 बंदरे, 8 प्रमुख विमानतळे आणि 8 मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (MMLP) तसेच जेवार विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट यांसारख्या आगामी ग्रीनफिल्ड विमानतळांनाही जोडणार आहे.

याशिवाय दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 6 राज्यांतून जाणारा हा एक्स्प्रेस वे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद वडोदरा, सुरत या आर्थिक केंद्रांमधून जाणार आहे.

नव्या एक्सप्रेस – वेमुळे दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 24 तासांवरून 12 तासांपर्यंत कमी होईल आणि अंतर 130 किमी कमी होणार आहे. यामुळे वार्षिक 32 कोटी लिटरपेक्षा जास्त इंधनाची बचत होईल आणि कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनात 85 कोटी किलोने घट होईल, जे 4 कोटी झाडे लावण्याइतकं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने महामार्गांलगत 40 लाखांहून अधिक झाडे आणि झुडपे लावण्याची योजना आखली आहे.

हा एक्सप्रेस – वे आशियातील पहिला वजगातील दुसरा अँनिमल ओव्हरपास ब्रिज आहे. यामध्ये 3 वन्यजीव आणि 5 हवाई पूल (ओव्हरपास) असतील ज्याची एकूण लांबी 7 किमी असणार आहे. एक्सप्रेस – वेमध्ये दोन मोठे 8 – लेनचे बोगदे देखील असतील. दिल्ली – मुंबई एक्सप्रेस – वे विविध जंगले, कोरडवाहू, पर्वत, नद्या अशा विविध भूभागातून जातो. वडोदरा – मुंबई विभागासाठी जास्त पर्जन्यमान असलेल्या भागासाठी कठोर फुटपाथ डिझाइनचा अवलंब करण्यात आला आहे.

दिल्ली – मुंबई एक्सप्रेस – वेवर 94 सुविधा म्हणजेच वे साइड सुविधा -WSAs तयार करण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांमध्ये पेट्रोल पंप, मोटेल, विश्रांती क्षेत्र, रेस्टॉरंट आणि दुकाने यांचा समावेश असेल. या मार्गाच्या बाजूच्या सुविधांवर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिपॅड देखील या एक्सप्रेसवेवर असणार आहे.

दिल्ली – वडोदरा – मुंबई एक्सप्रेस – वेमुळे केवळ प्रवासाची सोय होणार नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमानेही त्यावर उतरवता येतील. हा रस्ता रनवे म्हणून विकसित केला जात आहे. सोहना मधील अलीपूर ते मुंबई दरम्यान सुमारे 55 ठिकाणी असे भाग विकसित केले जात आहेत जिथे लढाऊ विमाने सहजपणे उतरवता येतील. अलीपूर ते दौसा या सुमारे 296 किलोमीटरच्या पट्ट्यात असे सुमारे 10 भाग आहेत, जिथे लढाऊ विमाने सहजपणे उतरवता येतात.

इंजीनियरिंगचे जबरदस्त उदाहरण..

या एक्सप्रेस – वेच्या बांधकामात 1.2 दशलक्ष टनांहून अधिक स्टीलचा वापर केला जात आहे, जो 50 हावडा पुलांच्या बांधकामाइतका आहे.

सुमारे 350 दशलक्ष घनमीटर माती हलवली जाईल, जी बांधकामादरम्यान 40 दशलक्ष ट्रकलोड्सच्या समतुल्य आहे.

भारताच्या वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमतेच्या सुमारे 2% असलेल्या या प्रकल्पासाठी 8 दशलक्ष टन सिमेंटचा वापर केला जाणार आहे.

एक्सप्रेस – वे सर्वसामान्यांसाठी कधी खुला होणार..

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोलवसुलीची तयारी पूर्ण करू शकलेले नाही, त्यामुळेच रविवारी उद्घाटन होऊनही वाहनचालकांना प्रवासासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. NHAI चे प्रकल्प संचालक मुदित गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर टेंट उभारण्यात येणार आहेत. ते टेकऑफ होण्यासाठी वेळ लागेल, त्यामुळे उद्घाटनानंतर 15 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात प्रवासाला सुरुवात होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.