शेती व्यवसायामध्ये सध्या दिवस बदलत चाललेले आहेत .अनेक उच्चशिक्षित युवक नोकरी न करता वेगवेगळी पिके घेऊन चांगले उत्पादन कसे घेता येईल , तसेच नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल हे पाहत आहेत .
बारामती तालुक्यातील निंबुत येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी श्रीकांत रामदास काकडे ( वय 26) यांनी आपल्या वीस गुंठे शेतजमिनीमध्ये चार फुटी पट्टा पद्धतीने व संपूर्ण मल्चिंग पेपर व ड्रिप इरिगेशन करून ‘ सागर ‘ या जातीच्या काकडीची लागवड केली .
काकडी शेती ठरली फायदेशीर:-
हे पीक तीस दिवसांत चालू होते. या पिकाला दोन ते तीन औषधाची फवारणी, दोन खुरपणी, तारकाटीच्या साहाय्याने वेल सुतळीने बांधले जाते .साधारण वीस गुंठ्यांत कमीत कमी तीस हजारांच्या आसपास खर्च येतो .ढगाळ वातावरण व थंडीमुळे उत्पन्नात घट आली तरी 20 गुंठ्यांत सात टन उत्पादन मिळाले . चालू बाजारभावाप्रमाणे सरासरी 28 रुपये किलोच्या आसपास काकडीला दर मिळाला वीस गुंठ्यांत दोन लाखांच्या आसपास नफा मिळाला .
खर्च वजा जाता 20 गुंठ्यांत एक लाख 70 हजार रुपये मिळाले . 60 दिवसांच्या कालावधीत काकडीपासून निव्वळ नफा मिळाला निंबुत मधील श्रीकांत काकडे यांचा अनोखा प्रयोग ठरतोय कमी कालावधीत अधिक नफा देऊन जाणारे पीक .