BREAKING : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अखेर 50,000 अनुदानाचा GR आला । पहा, तुम्हाला मिळणार का लाभ ; कोण पात्र, कोण अपात्र ? घ्या जाणून..
शेतीशिवार टीम : 30 जुलै 2022 :- शेतकरी मित्रांनो ज्या GR ची आपण दोन वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होतो अखेर तो GR आला असून त्यामुळे आता शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. आणि यामधून कोणते शेतकरी पात्र होणार, कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत ? हेसुद्धा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. या बद्दलची सविस्तर माहिती आज ‘शेतीशिवार’ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो पात्र / अपात्रतेची माहिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी आर्टिकल शेवटपर्यंत नक्की पहा….
राज्यात एकूण 153 लाख शेतकरी असून शेती व शेतीशी निगडीत कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. सन 2015-16 ते 2018-19 या सलग 4 वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाल्यामुळे मोठया प्रमाणात 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती. तसेच, राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.
या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होवू शकली नाही. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
उपरोक्त परिस्थिती विचारात घेता हिवाळी अधिवेशन 2019 मध्ये शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यानुसार याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. परंतु मार्च, 2022 पासून संपूर्ण देशात उद्भवलेल्या कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने सदर आश्वासनाची पूर्तता करणे शक्य झाले नाही.
त्यानंतर सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-2023 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ मान्यता देण्यात आली आहे.
पहा, ‘या’ पात्र शेतकऱ्यांना मिळणार रु. 50 हजार पर्यंत लाभ :-
१ ) या योजनेस “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना संबोधण्यात येईल.
२ ) नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, सन 2018 -19 आणि सन 2019 -20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आली आहे. या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे .
३ ) सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2018 पर्यंत पुर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2019 पर्यंत पुर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन 2019 -20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णतः परतफेड (मुद्दल+ व्याज) केली असल्यास अशा शेतकन्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019 -20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
मात्र , सन 2018-19 अथवा सन 2019 -20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु.50 हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019 -20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
4 ) प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक / अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.
सदर कर्जमुक्ती योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित :-
1) कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल
2) या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदल पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असणार आहे.
पहा, या अपात्र शेतकऱ्यांना मिळणार नाही रु. 50 हजार पर्यंत लाभ :-
1) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
2) महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री , आजी / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य,
3) केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
4) राज्य सार्वजनिक उपक्रम ( उदा: महावितरण, एस टी महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्नाचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
५ ) शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
६ ) निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे ( माजी सैनिक वगळून ) .
कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी ( अध्यक्ष , उपाध्यक्ष व संचालक मंडळ).
शेतकरी मित्रांनो, आता लवकरचं या 15 लाखांपेक्षा पात्र शेतकऱ्यांची यादी प्रकाशित केली जाणार असून ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार व्हेरिफिकेशन करून निधी उपलब्ध केल्यानंतर पात्र शेतकर्त्यांच्या खात्यात निधी वितरित केला जाईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.