शेतीशिवार टीम,15 डिसेंबर 2021:- देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) 2021 ते 2026 पर्यंत पाच वर्षांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
या निर्णयाचा 22 लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. यावर एकूण 93,068 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
ते म्हणाले की, 2021-22 ते 2025-26 पर्यंत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana) सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, ज्यामुळे सुमारे 22 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. यामध्ये अडीच लाख अनुसूचित जाती (SC/ST ) आणि दोन लाख अनुसूचित जमाती शेतकरी आहेत.
#Cabinet approves implementation of Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana for 2021-26 with an outlay of ₹93,068 crores
This will benefit about 22 lakh farmers, including 2.5 lakh SC and 2 lakh ST farmers#CabinetDecisions
Read: https://t.co/znHabc1m7n pic.twitter.com/nc421BhDOP
— PIB India (@PIB_India) December 15, 2021
या अंतर्गत, जलद सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत समाविष्ट नवीन प्रकल्पांसह 60 चालू प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. निवेदनानुसार, हर खेत को पाणी विभागांतर्गत भूपृष्ठावरील जलस्रोतांच्या माध्यमातून जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनाखाली 4.5 लाख हेक्टर सिंचन केले जाईल, योग्य ब्लॉकमध्ये 1.5 लाख हेक्टर भूजल सिंचनाखाली येणार आहे.