Take a fresh look at your lifestyle.

Shirur Gram Panchayat । शिरूरमध्ये ना भाजप, ना शिंदे गट, ना शिवसेना…फक्त राष्ट्रवादी ; ‘या’ 6 ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व…

0

शेतीशिवार टीम :- Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील राजकीय चढउतारांच्या दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर केले आहेत. एक दिवस आधी म्हणजे 4 ऑगस्टला राज्यातील 62 तालुक्यांतील एकूण 271 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी केंद्रांवर अजूनही मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत अनेक पंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत सर्व पंचायतींचे अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत ते नाशिक (40), धुळे (52), जळगाव (24), अहमदनगर (13), पुणे (19), सोलापूर (25), सातारा (10), सांगली (10) आहेत. (1), औरंगाबाद (16), जालना (28), बीड (13), लातूर (9), उस्मानाबाद (11), परभणी (3) आणि बुलढाणा (5).

या निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिंदे – ठाकरेंच्या वादात भाजपला फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

कोणत्या पक्षाच्या किती जागा विजयी ?

भाजप – 82
राष्ट्रवादी काँग्रेस – 53
शिंदे गट – 40
शिवसेना – 27
काँग्रेस – 22
इतर – 47

पुणे जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर पुण्यातील शिरूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा गुलाल उधळला आहे.

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी, जांबुत, म्हसे बुद्रूक, माळवाडी, सदरवाडी, तांदळी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती वर्चस्व मिळवले आहे.

टाकळी हाजी :- 16 पैकी 15 जागांवर राष्ट्रवादी विजयी.
म्हसे बुद्रूक :- 7 पैकी 5 जागांवर राष्ट्रवादी विजयी.
माळवाडी :- 7 पैकी 6 जागांवर राष्ट्रवादी विजयी.
सरदवाडी :- 7 पैकी 5 जागांवर राष्ट्रवादी विजयी.
जांबूत :- 11 पैकी 6 जागांवर राष्ट्रवादी विजयी.
तांदळी :- 11 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादी व शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी

शिरूर – आंबेगाव तालुक्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला जोरदार धक्का बसला असून सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले.

राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार अशोक पवार यांचा मोठा विजय झाला. तर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना या ठिकाणी धक्का बसल्याचे पहायला मिळालं .जांबुत टाकळी, हाजी सरदवाडी, माळवाडी, म्हसे तांदळी, या सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचा बोलबाला पाहायला मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.