Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Metro: फक्त 5 दिवसांत लाइन 7 व 2A वर 10 लाख लोकांचा प्रवास, मालाड ते अंधेरी गाठा अवघ्या 15 मिनिटात..

0

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली मुंबईत सुरु झालेली नवीन मेट्रो लाइन 7 आणि 2A मुंबईकरांसाठी खूप खास ठरली आहे. एकीकडे हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर नागरिकांना वाहतुक कोंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. तर प्रवासही अगदी सुखकर आणि आरामदायी झाला आहे.

त्याचबरोबर ही मेट्रो सुरू झाल्याने नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेतही मोठी बचत होत असल्याचे प्रवासी सांगत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईकरांमध्ये या मेट्रोची लोकप्रियता खूप जास्त असल्याचे दिसून येत आहे.

पीएम मोदींनी केले होते उद्घाटन..

मुंबई मेट्रोच्या लाइन 2A आणि 7 चे 17 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते, तर 20 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजल्यापासून मुंबईकरांसाठी ही मेट्रो सुरू करण्यात आली होती. अशा परिस्थितीत ही मेट्रो सुरू होताच ही मेट्रो प्रवासासाठी मुंबईकरांची पहिली पसंती ठरत आहे.

20 जानेवारीपासून सुरू झालेल्या या मेट्रो मार्गावरून 27 जानेवारीपर्यंत 1 दशलक्ष लोकांनी प्रवास केला आहे. यावरून या मेट्रोच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येऊ शकतो. त्यामुळेच या मार्गावर मेट्रोच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी, येथे रुपे कार्डही सुरू करण्यात आले आहे. प्रवासी या कार्डमध्ये 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत रिफिल करून घेऊ शकतात.

पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांची प्रतीक्षा संपली..

मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारे लोक मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या लाईन सुरु होण्यासाठी मोठ्या कालावधीपासून वाट पाहत होते. अशा स्थितीत ही मेट्रो सुरू झाल्यानंतर उर्वरित वाहतुकीची साधने सोडून लोक मेट्रोला आपली पहिली पसंती मानून प्रवास करत आहेत. अंधेरी पश्चिमेतील दहिसर E आणि DN नगर यांना जोडणारी मेट्रो लाईन 2A 18.6 किमी लांब आहे, तर अंधेरी E-दहिसर E (रेड लाईन) ला जोडणारी मेट्रो लाईन 7 – 16.5 किमी लांब आहे.

मालाड ते अंधेरी अवघ्या 15 मिनिटात..

मुंबई मेट्रो लाइन – 7 मार्गे अंधेरीहून 20 मिनिटांत कांदिवलीला पोहचल्यामुळे आनंद झाल्याचा अनुभवही काही युजर्सने ट्विटरवर शेयर केला आहे. प्रचंड ट्रॅफिक जाम आणि थकवणाऱ्या प्रवासालाला टाळून मेट्रोने प्रवास केल्याने प्रवासी आरामात घरी पोहोचत आहे. तर या मेट्रो लाइनमुळे मालाडवरून अंधेरीला अवघ्या 15 मिनिटांत पोहचता येत आहे.

किती आहे भाडे ?

19 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी 12,618 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा मेट्रो प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. मेट्रोपासून 35 किमी. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 60 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

मेट्रो 7 च्या 16.5 Km मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 30 रुपये खर्च करावे लागतील, तर मेट्रो-2A च्या 18.6 Km मार्गासाठी कमाल भाडे 30 रुपये आहे. हे दोन्ही मेट्रो कॉरिडॉर घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो – 3 कॉरिडॉरलाही जोडण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.