‘रोहयो’अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला लाभ; या 15 फळ पिकांसाठी मिळतंय 2 लाखांपर्यंत अनुदान, पहा अशी आहे अर्ज प्रोसेस..
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतामध्ये बांधावर पडीक जमिनीवर फळबाग इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना 3 वर्षात 100 टक्के अनुदान आहे. या अनुषंगाने किनवट तालुक्यातील 88 शेतकऱ्यांनी एकूण 6.05 हेक्टर जमिनीवर तब्बल 58 हजार 627 विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करून त्याचा लाभ घेतला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड करून आर्थिक उन्नती साधावी यासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. अल्प व अत्यल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (MREGS) व पाच एकरावर जमीन असणाऱ्या |शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना राबविली जात आहे.
बहुतांश शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड करतात. राज्यात गेल्या तीन वर्षात दरवर्षी प्रत्येकी 60 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. लागवडीला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येक वर्षी 40 हजार हेक्टरपेक्षा अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या 80 ते 90 टक्क्यांपर्यंत फळबाग लागवड झाली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करताना एप्रिल, मे महिन्यातच नियोजन करून खड्डे खोदले जातात. पावसाला सुरुवात झाली की, जून ते सप्टेंबर कालावधीत जास्तीत जास्त फळबाग लागवड केली जाते. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पाऊस पडला नाही. त्याचा लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसून येत असून नांदेड जिल्ह्यात यंदा उद्दिष्टाच्या केवळ 33.87 टक्के लागवड झाली आहे.
यापैकी किनवट तालुक्यामध्ये फळबाग योजनेअंतर्गत 75 हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी किनवट तालुक्यातील एकूण 210 शेतकऱ्यांच्या अर्ज संमत करुन प्रशासकीय मंजूर प्राप्त झाली होती. त्यापैकी प्रत्यक्षात 87 शेतकऱ्यांनी त्यांच्या 68.05 हेक्टर सलग जमिनीच्या क्षेत्रावर फळपिकांची लागवड करण्याच्या उद्देशाने 58 हजार 627 खड्डे खोदून तितक्याच फळझाडांच्या रोपांची लागवड केली.
यासोबत एका शेतकऱ्याने आपल्या एक हेक्टर शेताच्या बांधावर 20 फळझाडांची रोपे लावली आहेत. सलग क्षेत्रावर फळपिकनिहाय लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये आंबा 50.80 हेक्टर , सिताफळ 2 हेक्टर, पेरू 3 हेक्टर, कागदी लिंबू 1 हेक्टर, केळी 10.25 हेक्टर आणि मोसंबी 1 हेक्टर आणि एका शेतकऱ्यांने एक हेक्टर बांधावरील फळझाडे मिळून एकूण 88 शेतकऱ्यांनी आपल्या 69 .05 हेक्टर जमिनीमध्ये तब्बल 58 हजार 625 उपरोक्त फळझाडांची लागवड केलेली आहे.
100% अनुदानावर फळबाग लागवड योजना :- अर्ज प्रोसेस..
आंब्याची कलमे बाय मीटर अंतरावर हेक्टरी 400 झाडे लावण्यासाठी मजुरी व इतर सामुग्रीसाठी मिळून एकूण 2 लाख 33 हजार 973 रुपये अनुदान तीन वर्षामध्ये टप्याटप्याने प्राप्त होत असते.
याच धर्तीवर विविध अंतर व कलमांच्या संख्यनुसार पेरूसाठी 1 लाख 65 हजार 064 रुपये, मोसंबी कागदी लिंबूसाठी 1 लाख 93 हजार 124 रुपये, सीताफळासाठी 1 लाख 9 हजार 429 रुपये अनुदान प्राप्त होते. केळी या फळपिकाचा यंदाच या योजनेत समावेश केला असल्यामुळे अजून त्यासंदर्भातील अनुदानाबाबत माहिती प्राप्त झालेली नाही.