Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र रोजगार हमी योजना : 2022

0

शेतीशिवार टीम, 12 फेब्रुवारी 2022 : राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र रोजगार हमी योजना (Rojgar Hami Yojana) सुरू केली आहे. ही योजना 2005 मध्ये सुरू झाली आणि 2008 मध्ये संपूर्ण भारतात ही योजना सरकारने लागू केली. ही योजना नागरिकांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. योजनेंतर्गत नागरिकांना 100 दिवस (1 वर्ष) रोजगाराची हमी दिली जाते.

परंतु रोजगार मिळविण्यासाठी, अर्जदाराने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, रजिस्ट्रेशनशिवाय त्याला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.रजिस्ट्रेशन केल्यानंतर 15 दिवसांत नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तुम्हीही ग्रामीण भागातील असाल आणि तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करू शकता….

ग्रामीण भागात राहणाऱ्या बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्याचा उद्देश आहे . आज आपण या योजनेशी संबंधित महाराष्ट्र ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं ?, महाराष्ट्र रोजगार हमी योजना लिस्ट तपासण्याची प्रोसेस, योजनेचा उद्देश, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, फायदे आणि वैशिष्ट्ये इ. यासंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…

महाराष्ट्र रोजगार हमी योजना :- 

महाराष्ट्र रोजगार हमी योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा योजना (MNREGA) म्हणूनही ओळखली जाते. याशिवाय 2014 साली जागतिक बँकेच्या माध्यमातून या योजनेचा उल्लेख अहवालात करण्यात आला होता. या योजनेंतर्गत शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना या योजनेअंतर्गत रोजगार मिळू शकतो. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या बेरोजगार तरुणांना सरकारकडून सामाजिक सुरक्षाही दिली जाते. अर्जदाराला पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी इकडे-तिकडे कार्यालयाच्या फेऱ्याही माराव्या लागणार नाहीत, तो त्याच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून ऑनलाइन माध्यमातून पोर्टलला भेट देऊन रजिस्ट्रेशन पोझेस सहज पूर्ण करू शकतो, यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल…

रोजगार हमी योजनेचा उद्देश :-

राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कारण ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने नागरिकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शहरात यावे लागते आणि बाहेर राहून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र रोजगार हमी योजना सुरू करून नागरिक तरुणांना गावातच 100 दिवसांचा रोजगार हमी देणार आहे. गावात राहणाऱ्या सर्व वर्गातील नागरिकांना योजनेचा लाभ मिळून स्वत:च्या पायावर उभे राहता येणार आहे.

रोजगार हमी योजनेत कोणते येतात मंत्रालये…

ग्राम रोजगार सहाय्यक
मेट्स
क्लार्क
कनिष्ठ अभियंता
ग्रामपंचायत
कार्यक्रम अधिकारी
ग्रामीण विकास मंत्रालय
तांत्रिक सहाय्यक
राज्य रोजगार हमी परिषद
केंद्र रोजगार हमी परिषद
पंचायत विकास अधिकारी

रोजगार हमी योजनेंतर्गत काय रोजगार मिळेल ?

विहिरी बनवणे
बांधकाम साहित्य उपलब्ध करणे
दगड वाहणे
स्मशानभूमी विकास करणे
सामान वाहणे
पाणी उपलब्ध करणे
सिंचनासाठी खड्डे खोदणे
रस्त्याच्या कडेने झाडे लावणे
नद्या तलावाची स्वच्छता करणे
गटारांची व रस्त्यांची स्वच्छता करणे

महाराष्ट्र रोजगार हमी (Rojgar Hami Yojana) योजनेचे फायदे !

महाराष्ट्र रोजगार हमी योजना ही केवळ ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत रोजगार मिळाल्याने नागरिक स्वावलंबी आणि सशक्त बनतील आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील.
तरुण नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल आणि हळूहळू बेरोजगारीची समस्याही कमी होईल.
योजनेंतर्गत नागरिकांना 100 दिवस (1 वर्ष) रोजगाराची हमी दिली जाईल.
रोजगार मिळविण्यासाठी, अर्जदाराने पोर्टलला भेट देऊन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

कामासाठी अर्ज केल्याच्या 15 दिवसाच्या आत मोफत जॉब कार्ड दिलं जातं.

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसाठी पात्रता :- 

अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरिक असावा.
ही योजना लागू करून राज्यातील ग्रामीण बेरोजगार तरुणांना रोजगार मिळू शकतो.
बेरोजगार युवक 12वी पास असावा.
ज्या अर्जदारांचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे ते योजनेसाठी पात्र मानले जातील.
अर्जदाराला स्वतःची 5% रक्कम रोजगार योजनेत गुंतवावी लागेल.
रोजगार योजनेत जास्तीत जास्त 10 लाख कर्ज दिले जाऊ शकते.

आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
जातीचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुक
मतदार ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे कराल ?

सर्वप्रथम अर्जदाराने एम्प्लॉयमेंट एक्सचेंज विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावं लागेल.
त्यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.
होमपेज वर, तुम्हाला Registration च्या दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.  ( टीप : सकाळी ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु असतं )

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवं पेज उघडेल.
नवीन पेजवर, तुम्हाला विचारलेली माहिती भरावी लागेल जसे : अर्जदाराचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका, गावाचे नाव, पिन कोड क्रमांक, लिंग, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इ…
मोबाईल नंबर भरल्यानंतर तुम्हाला ‘SEND OTP’ या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टरकृत मोबाइल नंबरवर OTP मिळेल, तो दिलेल्या बॉक्समध्ये भरा.
आता तुम्हाला युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला रजिस्टरच्या दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
क्लिक केल्यावर, तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्या..

पहा संपूर्ण योजनेची PDF फाईल..

https://cutt.ly/sPqY80O 

Leave A Reply

Your email address will not be published.