शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा धक्का ! कापुस भाववाढीची शक्यता मावळली, ऑस्ट्रेलियातून पुन्हा 10 लाख क्विंटल कापूस आयात..
खरीप हंगामात अतिवृष्टीने कापसासह सर्वच मोठे खरीप पिकांचे माठ नुकसान झाले. पिकांवरील रोगराई, खते, औषधांच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी अगोदरच अडचणीत असताना कापसाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. घरात साठवून ठेवलेला कापूस आणखी किती दिवस घरात ठेवावा लागतोय, याची चिंता कापूस उत्पादकांना वाटू लागली आहे.
दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यात बहुतांश कापूस शेतकरी बाजारात विक्रीस आणतात; परंतू यावर्षी जानेवारी माहिना संपत आला असतांना कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत.
अशातच शेतकऱ्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली असून कापुस भाववाढीची शक्यता आता जवळपास मावळल्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण ऑस्ट्रेलियातून पुन्हा 10 लाख क्विंटल कापूस आयात करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
देशात 2023 मध्ये तब्बल 51 हजार टन कापूस म्हणजे 30 लाख क्विंटल कापूस ऑस्ट्रेलियातून विविध टप्प्यांत येणार असून 28 डिसेंबरला पहिला 5 लाख क्विंटल कापूस आयात करण्यात आला होता आता पुन्हा 10 लाख क्विंटल कापूस आयात करण्यात आला आहे. कापूस आयातीवर लागू असलेले 11% शुल्कदेखील माफ करण्यात आलं आहे.
मागील वर्षी सुरुवातीला सहा हजार क्विंटल दराने कापूस विकला गेला, तर एप्रिल अखेरपर्यंत कापसाला प्रति क्विंटल तेरा हजारापर्यंत भाव मिळाला होता. कापसाला जादा भाव मिळेल, आशेने मोठा खर्च केला, खर्चाच्या तुलनेत सध्या मिळणारा भाव कमी असल्याने कापूस उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
राज्यात कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मराठवाडा, विदर्भासहसह इतरही राज्यातल्या इतरही कृषी मंडलांमध्ये कापासाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
गेल्यावर्षी बाजारभाव वाढता राहिल्याने यावर्षी साडेनऊ हजार प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात असतानाही बाजारात कापसाची आवक अतिशय कमी होती. बाजारभावात वाढ होऊन दोन पैसे जादा मिळतील, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याचे चित्र कापूस उत्पादकांमध्ये दिसून येत आहे. घरात ठेवलेल्या कापसाचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.
नडी पुरतीच कापसाची विक्री..
चालूवर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडल्याने कापसासह सर्वच कांचे मोठे नुकसान झाले. खरीप पिकांचा काही शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून विमा योजनेत सहभाग घेतला मात्र, विमा कंपनीकडून तुटपुंजी मदत मिळाली तसेच अतिवृष्टी नुकसानीची मदत अद्यापही न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, रब्बी हंगामासाठी तसेच घर खर्चासाठीच्या नडीपुरता कापूस विक्रीस आणला जात आहे.
कृषी विभागाकडून कापूस साठवणुकीच्या सुविधेची गरज..
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वेचून आणलेला कापूस घरात साठवणूक करणे अगदी धोक्याचे ठरते. काही ठिकाणी कापसाला आगी लागण्याच्या घटनाही घडत असतात. जिह्यासह राज्यात कापसाचे मोठे उत्पादन घेतले जाते. यामुळे कापसाच्या साठवणुकीसाठी कृषी विभागाकडून अनुदानावर कापूस साठवणूक गृहासाठीची योजना आणल्यास शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. बाजारात एकाच वेळी होणारी आवकही थांबण्यास मदत होईल.