Panjabrao Dakh : वातावरणात मोठा बदल, आजपासून ‘या’ 10 जिल्ह्यांत गारपिटीसह अवकाळी पाऊस, पहा पंजाबरावांचा नवा हवामान अंदाज..
सध्या देशातील हवामानात क्षणा क्षणाला बदल होताना दिसत आहेत. एकीकडे देशातील सर्व राज्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे, तर अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. देशामध्ये 28 जानेवारी पर्यंत जम्मू-काश्मीर आणि हिमाचल, उत्तराखंडच्या अनेक भागात बर्फवृष्टी सुरू राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे, तर राजधानी दिल्लीसह हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागातही रिमझिम पाऊस पडू शकतो असे हवामान विभागाने सांगितले आहे. निसर्गाच्या या लहरीपणातून महाराष्ट्र हि सुटलेला नाही.
काल महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, नेवासा, राहुरी, नगर तालुक्यात बुधवारी रात्री पावसाने अचानक हजेरी लावली होती. यामुळे परिसरातील लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. राज्यात अहमदनगर सह नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा माध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
क्षणोक्षणी होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शेतकरी मात्र चिंतेत असल्याचे दिसून येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील मंगळवारी व बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोनई, चांदा व घोडेगाव परिसरात मोठे नुकसान झाले आहे. घोडेगावात तर चक्क हिवाळ्यात 24 मिमी पावसाची नोंद झाल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जालना जिल्ह्यात सजग दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा..
जालना शहरासह जिल्ह्यातील बदनापूर, अंबड तालुक्यात बुधवारी दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जालना शहरात काल रात्री साडेआठ वाजेदरम्यान जवळपास पंधरा मिनिटे पावसाने हजेरी लावली. यावेळी काही काळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती बदनापूर शहरासह परिसरात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे होते नव्हते तेही हिरावून घेतले आहे. तर अंबड तालुक्यातील सुखापुरी, वडीकाळ्या, करंजाळा, लखमापुरी, बेलगाव, उक्कडगाव त्याचबरोबर मठपिंपळगाव, शेवगा, गोलापांगरी या परिसरा पावसाने दणका दिला आहे.
पंजाबराव डख यांचा अंदाज काय ?
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले पंजाबराव डख यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील हवामान अंदाजावर भाष्य करताना 25 जानेवारीपासून नाशिक व अहमदनगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यात ढगाळ हवामान राहील तसेच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती. तर 26 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीटसह पाऊस होण्याची शक्यता आहे असे पंजाबरावांनी सांगितलं आहे. विशेषतः पूर्व विदर्भात 26 ते 28 जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील इतर भागात वातावरण असल्याने, हवामान कोरडं असलं तरी देखील तुरळक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच राज्यातील इतरही भागात ढगाळ हवामानामुळे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
भर थंडीच्या कडाक्याच्या कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत पडले आहेत. हिवाळ्यात कोसळणारा हा पाऊस शेती पिकांसाठी घातक ठरत आहे. या पावसामुळे पिकांवर रोगराई आणि किडींना आमंत्रण मिळत आहे. 30 जानेवारी रोजी राज्यात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. यामुळे देखील शेती पिकांना मोठा फटका बसणार असून यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
जानेवारी महिन्यातील ढगाळ वातावरणानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट येणार असल्याचे चित्र आहे. तर फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसांत राज्यात पुन्हा ढगाळ हवामान तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक स्वरूपाचा अंदाज देखील पंजाबराव डख यांनी बांधला असून याबाबत सविस्तर अंदाज येत्या काही दिवसात शेतकऱ्यांसमोर ते घेऊन येणार आहेत.