Take a fresh look at your lifestyle.

Indian Railway : भारतातला सगळ्यात छोटा रेल्वे रूट महाराष्ट्रात, प्रवास फक्त 3 Km अन् तिकीट दर तब्बल 1145 रु. पहा कुठे आहे हा रूट ?

0

रेल्वे ही भारतातील वाहतुकीसाठी सर्वात स्वस्त आणि सोयीचं साधन मानलं जातं. भारतीय रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कची लांबी 67 हजार रूट किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे.

देशभरात दररोज करोडो लोक ट्रेनमधून प्रवास करतात. भारतीय रेल्वे कोणत्याही एका वर्गाशी संबंधित नसून सर्व वर्गाशी संबंधित आहे. उच्च वर्गातील लोक ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसी डब्यातून प्रवास करतात तर मध्यम – गरीब वर्गातील लोक जनरल क्लासच्या डब्यातून प्रवास करतात. भारतीय रेल्वेबद्दल अशा अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते.

देशातील सर्वात लहान रेल्वे रूट महाराष्ट्रात..

आज आपण भारतीय रेल्वेच्‍या सर्वात लहान रूटविषयी जाणून घेणार आहोत, ज्‍याबद्दल तुम्‍हाला फारशी माहिती नसते. भारतीय रेल्वेच्या सर्वात लहान मार्गाची एकूण लांबी 3Km आहे. म्हणजेच भारतीय रेल्वे नेटवर्कच्या 2 स्टेशन्समधील एकूण अंतर फक्त 3 Km आहे. रेल्वेचा हा सर्वात लहान मार्ग नागपूर आणि अजनी स्टेशनला जोडला आहे.

नागपूर ते अजनी रेल्वे स्थानकामधील एकूण अंतर 3 Km आहे. भारतातील कोणत्याही दोन रेल्वे स्टेशनमधलं अंतर 3 Km पेक्षा कमी नाही. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नागपूर ते अजनी दरम्यानचे 3 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठीही अनेक लोक ट्रेनचा वापर करतात.

3 Km साठी फर्स्ट क्लासचे भाडे आहे 1145 रुपये 

Ixigo या ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलनुसार, नागपूर ते अजनी दरम्यानचा ट्रेनने प्रवास 8 ते 9 मिनिटांत पूर्ण होतो. या प्रवासाचे भाडे सर्वसाधारण वर्गासाठी (GS) 60 रुपये, स्लीपर क्लाससाठी (SC) 175 रुपये, थर्ड एसीसाठी (Third AC) 500 रुपये, सेकंड एसीसाठी (SAC) 750 रुपये आणि फर्स्ट क्लाससाठी 1145 रुपये आहे.

हायटेक वेटिंग लाउंज, फ्री वाय – फाय, जबरदस्त कनेक्टिव्हिटी..! महाराष्ट्रातल्या 123 स्टेशनचा होणार कायापालट.. !

रेल्वे हे भारतातील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत लोकांचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे सातत्याने मोठे काम करत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहात सांगितले की, नुकत्याच सुरू झालेल्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत देशात 1275 स्थानके विकसित केली जात आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 149, महाराष्ट्रातील 123 आणि पश्चिम बंगालमधील 94 स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहेत.

किती बदललं जाणार स्टेशनचे स्वरूप..

रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, अमृत भारत स्थानक योजनेत (Amrit Bharat Station Scheme) स्टेशनच्या विकासाबाबत दीर्घकाळ चर्चा होत आहे. यामध्ये स्टेशनच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत स्टेशनची कार्यरत क्षेत्रे, वेटिंग रूम, टॉयलेट, लिफ्ट आणि ऑटोमॅटिक जिने, स्वच्छता, फ्री वाय-फाय, वन स्टेशन – एक प्रॉडक्टसाठी कियोस्क, उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज इत्यादींचा समावेश आहे.

कोणत्या राज्यात किती स्टेशन होणार विकसित ?

आंध्र प्रदेश – 72
अरुणाचल प्रदेश – 1
आसाम – 49
बिहार – 86
छत्तीसगड – 32
दिल्ली – 13
गोवा – 2
गुजरात – 87
हरियाणा – 29
हिमाचल प्रदेश – 3
झारखंड – 57
कर्नाटक – 55
केरळ – 34
मध्य प्रदेश – 80
महाराष्ट्र – 123
ओडिशा – 57
पंजाब – 30
राजस्थान – 82
तामिळनाडू – 73
तेलंगणा – 39
त्रिपुरा – 4
उत्तर प्रदेश – 149
उत्तराखंड – 11
पश्चिम बंगाल – 94
जम्मू आणि काश्मीर – 4

Leave A Reply

Your email address will not be published.