मुंबई – पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘हा’ 77Km चा मार्ग 8 लेनचा होणार, मिसिंग-लिंकचे कामही अंतिम टप्प्यात..
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई – पुणे एक्सप्रेस – वेच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत एक्सप्रेस वेवरील घाट विभाग वगळता संपूर्ण महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्याच्या सहा पदरी रस्त्याचे आठ पदरी रस्त्यात रूपांतर होणार आहे. MSRDC च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 94 कि.मी. लांब एक्सप्रेस – वेवर 77 किमी. मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.
मुंबई – पुणे अंतर कमी करण्यासाठी एक्सप्रेस – वेच्या घाट विभागात मिसिंग लिंक प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे घाट विभागातील प्रवाशांना पर्यायी मार्गाची सुविधा उपलब्ध होणार आहे. द्रुतगती मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेचा टोल कालावधी 2045 मध्ये संपणार आहे. महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी सुमारे 6080 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. या प्रकल्पाच्या खर्चाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. एक्सप्रेस – वेच्या विस्तारीकरणावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी टोलचा कालावधी 10 ते 15 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे.
सन 2022 मध्ये 94.5 कि.मी. लांबीचा महामार्ग बांधण्यात आला. या महामार्गावरून मुंबई – पुणे प्रवास अवघ्या तीन ते चार तासांत पूर्ण करता येणार आहे. महामार्गावरून दररोज 1.55 लाख वाहनांची वाहतूक होते.
मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात..
एक्स्प्रेसवेचे अंतर कमी करण्यासाठी खोपोली एक्झिटजवळ पर्यायी मार्ग तयार करण्यात येत आहे. मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील अंतर 6 किमीपर्यंत कमी होईल. त्यामुळे प्रवाशांचा सुमारे 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. सध्या महामार्गावरील खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 19 किमी आहे.
मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर 19 कि.मी. अंतर कमी होऊन 13.3 किमी कमी होणार आहे. MSRDC या मार्गावर दोन बोगदे तयार करत आहे, 2 डेकद्वारे आणि 8 लेन. खोपोली येथील एक्स्प्रेस वेला मिसिंग लिंक जोडण्यासाठी स्लिप रोड तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई – पुणे शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. याशिवाय या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशातील या पहिल्या काँक्रीट महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्याचबरोबर सुटीच्या दिवशी या महामार्गावर अनेक कि.मीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अटल सेतू थेट एक्सप्रेस – वेशी जोडण्यासाठी कनेक्टरचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.