Police Bharti 2022 : अखेर 14,956 पोलीस भरतीची जाहिरात निघाली, ‘या’ दिवशी करता येणार अर्ज; पहा जिल्हानिहाय कुठे किती जागा ?
पोलीस भरतीच्या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृहखात्यामार्फत आयोजित केलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत राज्यात 14 हजार 956 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची जाहिरातही प्रकाशित झाली असून येत्या नोव्हेंबर महिन्यापासून दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यातील रिक्त जागांसाठी 3 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 असणार आहे. या संदर्भातील अधिकृत वेबसाईट वर GR आणि माहिती अजून यायची आहे. राज्यात विविध जिल्ह्यातील तब्बल 14 हजार 956 जागासाठी ही भरती असणार आहे.
राज्यातील सर्वात जास्त जागा ह्या मुंबई पोलिसांत भरल्या जाणार 6 हजार 740 पदे भरली जाणार असून पुणे पोलिसांत 720 पदे भरली जाणार आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने (State Police Headquarters) 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील 5 हजार 468 पदे भरली जाणार आहे.
याबाबत 1 नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
या आधी राज्य शासनाने 14 ऑक्टोबर 2022 रोजी एक GR काढून 100% रिक्त जागा असलेल्या भरण्यास मान्यता दिली आहे. या GR नुसार राज्यात पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील तब्बल 14 हजार 443 पोलिसांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिस भरती प्रक्रियेची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या व्हेबसाईटवर मिळणार आहे.
पहा जिल्हानिहाय कुठे किती जागा भरल्या जाणार. . .
मुंबई – 6740
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720
पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204
अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68
रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131
नाशिक ग्रामीण – 454
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24
पुणे ग्रामीण – 579
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132
भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348
गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण – 156
अकोला – 327
बुलढाणा – 51
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड – 155
परभणी – 75
यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा ?
अनुसूचित जाती – 1811
अनुसूचित जमाती – 1350
विमुक्त जाती (अ) – 426
भटक्या जमाती (ब) – 374
भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) – 292
विमुक्त मागास प्रवर्ग – 292
इतर मागास वर्ग – 2926
इडब्लूएस – 1544
खुला – 5468 जागा
एकूण – 14956
पात्रता :-
12 पास
महिला उंची :- 155 सेंमी
पुरुष उंची :- 165 सेंमी
उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 25 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष शिथिल)
मैदानी परीक्षेचं कसं असणार स्वरूप :-
मैदानी चाचणीमध्ये पहिल्यांदा धावणे, गोळाफेक, त्याचबरोबर 100 मीटर धावणे, असं या मैदानी चाचणीचे स्वरूप असणार आहे.
पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणी :-
शारीरिक चाचणी (50 गुण) :-
जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे
आवश्यक असेल.
(1) पुरुष उमेदवार गुण
(i) 1600 मीटर धावणे :- 20 गुण
(ii) 100 मीटर धावणे :- 15 गुण
(iii) गोळाफेक :- 15 गुण
एकूण :- 50 गुण
महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी :-
(i) 800 मीटर धावणे :- 20 गुण
(ii) 100 मीटर धावणे :- 15 गुण
(iii) गोळाफेक :- 15 गुण
एकूण :- 50 गुण
लेखी चाचणी (100 गुण) :-
() शारीरिक योग्यता चाचणी मध्येकिमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
लेखी चाचणीमध्ये खालील विषय असणार समाविष्ट :-
(1) अंकगणित ;
(2) सामान्य ज्ञान व चालूघडामोडी
(3) बुध्दीमत्ता चाचणी ;
(4) मराठी व्याकरण.
लेखी चाचणीमध्येविचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल.
लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे इतका असेल.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्येकिमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40%
पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
संपूर्ण नवीन GR वाचनासाठी – येथे क्लिक करा