Take a fresh look at your lifestyle.

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याचा अनोखा, प्रयोग थेट शेतकरी ते ग्राहक विकतायेत भाजीपाला!

0

शिरूर पुणे जिल्ह्याच्या तालुक्यातील पिंपळे जगतापमधील प्रताप शिवाजी निकम हे मूळचे शेतकरी.मात्र,त्यांनी स्वतःच्या कष्टावर पुण्यातील मार्केटयार्डात यशस्वी व्यापार केला . स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले असून आता पुन्हा ते शेतीकडे वळले आहेत . ते शेतीत विविध अभिनव प्रयोग करत आहेत . निकम यांनी अडीच एकर क्षेत्रात लिंबाच्या 500 झाडांची लागवड केली असून सेंद्रिय पद्धतीने ते उत्पादन घेत आहेत . 

तसेच ते उत्पादित केलेला माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत असल्याने भावही चांगला मिळत असून ग्राहकांनाही त्याचा फायदा होत आहे . लिंबाच्या एका झाडाला वर्षभरात तब्बल सातशे ते 800लिंबे मिळतात. एकूण एकरी 3लाख रुपये उत्पन्न मिळत आहे . निकम यांच्या शेतामध्ये पूर्वी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते . मात्र ,एप्रिल , मे आणि जून महिन्यामध्ये पाणी सर्वच पिकांना मुबलक प्रमाणात मिळू लागले .

लिंबाच्या शेतीत पालेभाज्या, फ्लॉवर, कोबी आणि कांदापात यांचे आंतरपीक घेतले जात आहे. गेल्या वर्षी 10 टन कांद्याचे उत्पादन झाले असून एकरी एक लाख 20 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे उत्पादित केलेला सर्व माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यातही ते यशस्वी झाले आहेत . निकम यांच्या शेतात जास्तीत जास्त शेतमाल हा सेंद्रिय पद्धतीने तयार केला जात आहे . सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयोग सुरू केला हा प्रयोग यशस्वी होत आहे .

निकम यांनी वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरवठ्यावर मात करण्यासाठी सौरऊर्जेवर पंप चालवून शेतीला पाणीपुरवठा केला जात आहे . पाण्याची बचत करण्यासाठी संपूर्ण शेतीवर ठिबक सिंचनचा वापर केला जात आहे. तसेच नगदी पीक थोड्याफार प्रमाणात असावे , म्हणून उसाचीही लागवड केली आहे . मात्र , पूर्वीच्या तुलनेत उसाची लागवड ही कमी प्रमाणात केली आहे. निकम यांनी अडीच एकर क्षेत्रात लखनौ 49 या जातीच्या महिन्यामध्ये उसाला पाणी कमी पडत होते . त्यामुळे त्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून लिंबासह अन्य पिकांची लागवड केली. त्यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत पेरूची लागवड केली आहे.

या लागवडीला एक वर्ष पूर्ण झाले आहे.या पेरूची चव ही गावरान पेरूसारखीच आहे . तब्बल 200 ग्रॅम वजनाचा एक पेरू असतो . गेल्या वर्षी या पेरूला 20 ते 25 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला असून ग्राहकांकडून मागणीही चांगली आहे. तसेच स्वतःच्या शेतामध्ये विविध पिकांची लागणारी बहुतांश रोपेही स्वतःच तयार करतात . यासाठी त्यांनी पॉलिहाऊसचीही उभारणी केली आहे . यामध्ये टोमॅटो , फ्लॉवर ,

कोबी या पिकांची रोपे तयार केली जातात . दरम्यान , गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत . एकूण 15 एकर शेती असून अडीच एकर लिंबू , अडीच 1 एकरामध्ये एकर पेरू, एक एकरामध्ये पॉलिहाऊस , जनावरांचा गोठा आणि पाच एकर क्षेत्रावर उसाचे उत्पादन घेतले जात आहे . एकाच वेळी विविध प्रकारची पिके घेतल्यामुळे शेतीमध्ये नुकसान होत नसल्याची निकम यांची भावना असून याबाबत ते म्हणतात की, अनेक पिके घेतल्याने काही पिकांना बाजारभाव कमी असल्यावर होणारा तोटा हा इतर पिकांना चांगला भाव मिळाल्यास भरून निघतो.

परिणामी, शेती ही तोट्याची न होता फायद्याचीच होत असल्यामुळे विविध प्रकारची पिके घेणे हे फायदेशीर राहते . शेतीच्या जोडीला पशुपालन हादेखील त्यांनी जोडव्यवसाय सुरू केला आहे . यासाठी त्यांनी शेतामध्ये काही गीर गाईही सांभाळल्या आहेत . जनावरांपासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर हा शेतीत करत आहेत . निकम हे मूळचे ग्रामीण भागातील आहेत .मात्र , पुण्यात ते व्यवसायानिमित्त स्थायिक झाले असताना आता पुन्हा ते शेतीकडे वळले असून शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत आहेत . सद्यःस्थितीत त्यांना शेतीमध्ये पत्नी , मुलगा आणि सून यांचीही मोलाची साथ मिळत आहे .

प्रताप शिवाजी अलीकडील काही वर्षांमध्ये शेती करताना त्यावर रासायनिक पिकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे . त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. म्हणून मी शेती करताना जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर दिला आहे. तसेच , वीज आणि पाणीबचत ही काळाची गरज असल्याने त्यांचाही काटकसरीने वापर करत आहे . – प्रताप शिवाजी निकम , शेतकरी , पिंपळे जगताप , ता . शिरूर , जि . पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.