शेतीशिवार टीम, 11 मार्च 2022 : राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान’ योजने अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना 11 हजार रुपये इतके मानधन देण्याचा महत्वपूर्ण आणि दिलासादायक शासन निर्णय घेऊन दिलासा दिला आहे.
गोवा, झारखंड, अरुणाचल प्रदेश, अशा राज्यात राबवण्यात आलेल्या योजनेचा लाभ राज्यातील पत्रकारांना मिळावा म्हणून राज्याच्या मागील विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पत्रकारांसाठी पेन्शन योजना उपक्रम हा लवकरच सुरू केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्याचीच अंबलबजावणी काल 10 मार्च 2020 रोजी एक शासन निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या अशा घटकांना सामाजिक सुरक्षा, सुविधा देण्याचा विचार राज्य शासनाच्या मनात होता आणि याच अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय येथे घेण्यात आलेला आहे.
2 फेब्रुवारी 2019 रोजी खात्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर पत्रकारांचा सन्मान योजना ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्याच्या अंतर्गत 2018 -19 साठी 15 कोटी आणि 2021-22 साठी 10 कोटी असे एकूण 25 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे.
याचा फायदा अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत देणे करता शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या विश्वस्त संस्थेची स्थापना 2009 मध्ये करण्यात आलेली असून आणि या संस्थेचा 10 कोटी रुपये निधी असा एकूण 35 कोटी रुपये निधीच्या माध्यमातून हे मानधन देण्यात येणार आहे.
शासन निर्णयात काय आहे ते आपण पाहूया…
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने अशा घटकांना सामाजिक सुरक्षा सुविधा देण्याचा विचार करून ज्येष्ठ पत्रकार आपत्ती आधार भाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याच्या वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजने अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना 11 हजार रुपये दरमहा इतके अर्थ साहाय्य देण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर नरिमन पॉईंट मुंबई येथे इंडियन बँकेच्या खात्यामध्ये असलेली मुदत ठेव रक्कम ही 35 कोटी रुपये रक्कम यासाठी वापरण्यात यावी सहा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.अशा प्रकारचा शासन निर्णय घेतल्यामुळे ज्येष्ठ पत्रकारांना तर नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
आता आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी पात्रता पाहूया….
सर्व कार्यरत पत्रकार, छायाचित्रकार, वर्तमानपत्रांचे संपादक, इतर बातम्या प्रसारित करणारी माध्यमे आणि फ्रीलांसर आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना पेन्शन लाभ मिळवण्यास पात्र आहेत.
सर्व पात्र मीडिया व्यक्तींचे वय 60 वर्षे असणे आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त, पात्र लोकांनी मीडिया रिपोर्टिंग व्यवसायात 30 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
सर्व ज्येष्ठ पत्रकारांना किमान 10 वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे.
अर्जदार पत्रकारांचे उत्पन्नाचे एकमेव साधन म्हणून पत्रकारिता असावी.
अर्जदाराला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रोताकडून पेन्शन मिळत नसली पाहिजे.
त्यानुसार, उपजीविकेसाठी पत्रकारिता करणारे 10 वर्षांचा अनुभव असलेले सर्व मान्यताप्राप्त पत्रकार पेन्शन योजनेसाठी पात्र असतील.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, पात्रता निकषांपैकी हे अनिवार्य आहे की अर्जदार आयकरदाता नसावा.
निवृत्तीवेतन लाभार्थ्यांना त्यांच्या हयातीतच दिले जाईल आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निकटवर्तीयांना नाही…
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत पेन्शन कशी मिळेल…
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांसाठीच्या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जिल्हा माहिती कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या समितीने छाननी केली जाईल. पात्रता निकषांची पूर्तता करणार्या सर्व अपरिचित पत्रकारांना पेन्शन देण्याचा निर्णय घेणे पूर्णपणे समितीच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.