e-KYC केलेल्या 3 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 700 कोटींच्या निधीचा नवा GR आला, ‘या’ दिवशी 50,000 रु. होणार खात्यात जमा !
50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आलं आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदानाच्या वितरणासाठी 700 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
शेतकरी मित्रांनो, 2017- 18 – 19 आणि 19 – 20 तीन वर्षापैकी कोणतेही दोन वर्षे आपल्या अल्पमुदत पीक कर्जाची विहित मुदतीमध्ये परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जात आहे. यासाठी पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून तब्बल साडे सहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले आहे. परंतु, पहिल्या टप्प्यामध्ये e-KYC केलेले तीन लाख शेतकरी अद्याप देखील अनुदानाच्या प्रतीक्षेत होते.
तसेच आपण पाहिलं तर दुसरी – तिसरी यादीही प्रकाशित करण्यात आली आणि या दोन्ही यादीमधील लाभार्थ्यांच्या माध्यमातून e-KYC देखील करण्यात आली होती, परंतु, अद्यापही त्यांच्या खात्यावर अनुदानाचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं.
याबाबत हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान कधी दिलं जाणार ? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना वित्तमंत्राच्या उत्तरात म्हटले होते की, जानेवारीच्या शेवटपर्यंत e-KYC झालेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केलं जाईल अशा प्रकारची माहिती दिलेली होती. ती कार्यवाही सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
या योजनेकरिता, 2022 – 23 वर्षासाठी पुरवणी मागण्यांद्वारे 4 हजार 700 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते. यातील पहिल्या हप्त्यापोटी 2,350 कोटी त्यानंतर दुसऱ्या हप्त्यापोटी 650 कोटी आणि आजच्या शासन निर्णयानुसार, तिसऱ्या हप्त्यापोटी 700 कोटींचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
आता एकंदरीत एकूण मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी 3,700 कोटी रुपयांचे वितरण आजपर्यंत झालेले आहे. आणखी 1 हजार कोटी रुपयांचा निधी बाकी आहे. या यादीतील e-KYC झालेल्या, पात्र झालेल्या, कागदपत्रांची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच म्हणजे मार्चपूर्वीच 1 हजार कोटींचे वितरण केले जाणार आहे.
या व्यतिरिक्त जे शेतकरी पात्र होतील त्यांच्यासाठी नव्याने बजेटमध्ये तरतूद करून त्या शेतकऱ्यांना पुढे पात्र केले जाईल. परंतु बऱ्याच दिवसापासून e-KYC केलेल्या व अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच्यामुळे आता या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे.
एकंदरीत आपण पाहिलं तर, आतापर्यंत अंमलबजाणी झालेल्या पात्र शेतकऱ्यांमध्ये डीसीसी बँकेचे किंवा सोसायटीचे शेतकरी असल्यामुळे त्यांची कर्ज खाते 7,000 10,000 15,000, 20,000, 25,000 तो 30,000 पर्यंत असल्याने अशा छोट्या प्रमाणामध्ये निधीचे वितरण केलं जातं आहे.
मोठ्या प्रमाणात लाभार्थी असणारे शेतकरी हे राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका चे आहेत त्याची यादी लागल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागू शकते. त्यामुळे त्याच्या अद्याप याद्या आलेल्या नाहीत त्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी जास्तीचा निधी लागू शकतो.