Take a fresh look at your lifestyle.

Budget 2023 for Agriculture : बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी 8 मोठ्या घोषणा, नैसर्गिक शेतीवर भर, कृषी स्टार्टअपसाठी तरुण उद्योजकांना..

0

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी सुरूच राहणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. अन्नधान्याच्या बाबतीत भारताला जागतिक केंद्र बनवायचे आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्यासाठी हैदराबादमध्ये ‘श्री अन्ना’ भारतीय संस्था स्थापन केली जाणार आहे. जे सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून विकसित केले जाणार असून येथे संशोधन केलं जाणार आहे.

1. शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा..

कृषी क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. हे पीक नियोजन आणि आरोग्यासाठी माहिती सेवा, शेती निविष्ठा, कर्ज आणि विमा, मार्केट इंटेलिजन्स आणि कृषी तंत्रज्ञान उद्योग आणि स्टार्टअप्सच्या विकासासाठी मदत करेल.

2. एग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड..

तरुण उद्योजकांना ग्रामीण भागात कृषी स्टार्टअप्स उघडण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कृषी प्रवेगक निधी तयार केला जाईल. या निधीचा उद्देश शेतकर्‍यांसमोरील आव्हानांवर किफायतशीर उपाय उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच शेती पद्धतीत बदल, उत्पादन आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणणार आहे.

3. कापूस पिकाचे उत्पादन वाढवणे..

एक्स्ट्रा लांब रेषेदार कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) द्वारे क्लस्टर आधारित आणि मूल्य साखळी अवलंबली जाईल. शेतकरी, राज्य आणि उद्योग यांच्या सहकार्याने इनपुट पुरवठा विस्तार सेवा आणि मार्केट लिंक्सची व्यवस्था केली जाणार आहे.

4. आत्मनिर्भर बागवानी स्वच्छ पौध कार्यक्रम

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 2,200 कोटी रुपये खर्च करून, उच्च मूल्याच्या फलोत्पादन पिकांसाठी रोगमुक्त, दर्जेदार लागवड सामग्रीची उपलब्धता वाढवण्यासाठी स्वयंपूर्ण स्वच्छ वनस्पती कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.

5. कृषी कर्ज

शेतकर्‍यांचे कर्ज सुरूच राहणार आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे उद्दिष्ट 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवलं ​जाणार आहे.

6. मत्स्यव्यवसाय क्षेत्र

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले की, 6,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह PM मत्स्य संपदा योजना (प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना- PMMSY) ची नवीन उप-योजना सुरू करणार आहोत जेणेकरून मच्छीमार, मासे विक्रेते, एमएसएमई (MSME) त्यांच्या कामात अधिक सक्षम होऊ शकतील. तसेच मूल्य साखळीत सुधारणा आणून बाजारपेठ वाढवता येईल.

7. सहकारी संस्था

शेतकरी, विशेषत: लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि इतर वंचित भागांसाठी सरकार सहकारावर आधारित आर्थिक विकास मॉडेलला प्रोत्साहन देणार आहे.

8. बाजारीच्या उत्पादनवाढीसाठी ‘श्री अन्ना’ ग्लोबल ग्लोबल सेंटर.

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाले, आम्ही जगातील सर्वात मोठे उत्पादक आणि ‘श्री अन्ना’ चे दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार आहोत. आपण अनेक प्रकारचे ‘श्री अन्ना’ पिकवतो. जसे- ज्वारी, नाचणी, बाजरी, कुट्टू, रामदाणा, कांगणी, कुटकी, कोडो, चेना आणि साम. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स रिसर्च, हैदराबादला भारताला ‘श्री अन्ना’ चे जागतिक केंद्र बनवण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून प्रोत्साहन दिले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.