Take a fresh look at your lifestyle.

Budget 2023 : महिलांसह जेष्ठ नागरिकांना बजेटमध्ये मोठं गिफ्ट..! आता महिलांना ‘या’ योजनेतून मिळणार भरघोस व्याज..

0

Budget 2023 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2023) मध्ये महिला आणि वृद्धांना मोठी भेट दिली आहे. महिलांसाठी नवी बचत योजना महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना बचतीवर भरघोस व्याज मिळणार आहे तसेच, ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे.

महिला सन्मान बचत योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी 11 वाजता लोकसभेत 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. तत्पूर्वी,अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन अर्थसंकल्प सादरीकरणाची माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी सभागृहात पोहोचून आपल्या बजेटच्या बॉक्समधून अनेक योजनांची घोषणा केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवीन बचत योजना सुरू केली. या नव्या बचत योजनेला ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजना असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये महिलांना 2 लाख रुपयांच्या बचतीवर 7.5 टक्के व्याज मिळणार आहे. महिला सन्मान बचत योजना 2025 पर्यंत चालणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी भेट :-

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा दिलासा दिला आहे. ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे.

पॅनकार्ड आता राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून ओळखलं जाणार..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कायम खाते क्रमांक असण्यासाठी आवश्यक व्यावसायिक आस्थापनांसाठी विशिष्ट सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅनचा वापर समान ओळखकर्ता म्हणून केला जाईल.

सर्वसाधारण अर्थसंकल्पात महिलांचा मोठा सन्मान..

2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात आज एक इतिहास रचला गेला जेव्हा देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सामान्य अर्थसंकल्पाच्या निमित्ताने भारताच्या राष्ट्रपती महिला आणि अर्थमंत्रीही महिला आहेत. देशाची निम्मी लोकसंख्या अभिमानाने मान वर करून जय हिंद म्हणू शकते, हा अर्थ स्पष्ट झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.