Take a fresh look at your lifestyle.

Budget 2023 : 8 कोटी करदात्यांमध्ये आनंदाची लाट, नव्या टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल, आता 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर..

0

मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात इनकम टॅक्समध्ये सूट देण्याची घोषणा करून देशातील करोडो जनतेला मोठी भेट दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात आयकरात मोठा दिलासा दिला आहे.

आता वार्षिक 7 लाखांपर्यंत कमाईवर कोणताही कर भरावा लागणार नाही. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेचे संसदेतील सर्व सदस्यांनी टेबल थोपटून स्वागत केलं. करमाफीची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या अर्थसंकल्पापूर्वीही लोकसभा निवडणुकीपूर्वी आयकर सवलतीची मर्यादा वाढवून मोदी सरकार जनतेला मोठी भेट देईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. अर्थसंकल्पाबाबत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत असलेली ही अपेक्षा खरी ठरली. अर्थमंत्र्यांनी करमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे नोकरदारांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाही..

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले की, आता 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही. हे नवीन कर प्रणाली अंतर्गत देण्यात येईल. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेचा 8 कोटींहून अधिक करदात्यांना फायदा होणार आहे. हे माहित असले पाहिजे की 8 वर्षापासून करात कोणतेही बदल केलेले नव्हते.

आता असा असेल न्यू टॅक्स स्लॅब..

आयकर टॅक्स %
0 ते तीन लाख – 0 %
3 ते 6 लाख – 5 %
6 ते 9 लाख – 10 %
9 ते 12 लाख – 15 %
12 ते 15 लाख – 20 %
15 लाखाच्या वर – 30%

न्यू टॅक्स स्लॅब..

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, नवीन कर तरतुदींनुसार 0-3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. 3-6 लाख रुपयांवर 5% कर लागेल. आतापासून 6-9 लाख रुपयांवर 10% कर आणि 9-12 लाख रुपयांवर 15% कर. 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तुम्हाला 30% कर आकारला जाईल.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही मोठी भेट..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय शेतकरी, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अमृतकालचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत असल्याचेही ते म्हणाले..

Leave A Reply

Your email address will not be published.