दिल्ली – मुंबई एक्सप्रेस-वे : 276 Km चा पहिला टप्पा होणार खुला, ‘या’ 2 राज्यातील शहरांच अंतर येणार फक्त तीन तासांवर, पहा रोडमॅप..
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सोहना ते दौसा (राजस्थान) एक्स्प्रेस वे सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे दिल्ली – गुरुग्राम आणि इस्टर्न पेरिफेरल मार्गे राजस्थानला जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुढील महिन्या (फेब्रुवारी) हा एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्ली ते डोसा आणि जयपूरचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. साधारण साडेतीन तासात डोसा आणि पाच तासात जयपूर गाठणे शक्य होईल. एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर टोलवसुलीही सुरू होईल कारण ठिकठिकाणी टोलनाके तयार करण्यात आले आहेत.
हा एक्सप्रेस वे हरियाणा (80 किमी), राजस्थान (380 किमी), मध्य प्रदेश (370 किमी), गुजरात (300 किमी) आणि महाराष्ट्र (120 किमी) या पाच राज्यांना जोडला जाणार आहे. या मार्गावर नवीन औद्योगिक टाउनशिप आणि स्मार्ट सिटीची योजना आखण्यात आली आहे. सुमारे 50 किमी अंतराने दोन्ही बाजूला 92 मार्ग सुविधांची योजना करण्यात आली आहे. या नव्या महामार्गामुळे दिल्ली आणि मुंबई दरम्यानचे अंतर सुमारे 150 किमी ने कमी होऊन प्रवासाचा वेळ सध्याच्या 24 तासांवरून 12 तासांवर येणार आहे.
ट्रायल झाली पूर्ण..
NHAI अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, एक्सप्रेसवेच्या मुख्य रस्त्याची ट्रायल घेण्यात आली आहे, ज्यामुळे सर्व बाबींची पूर्तता केली आहे. टोल वसुलीसाठी बसवलेले स्कॅनर आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (ANPR) कॅमेरेही व्यवस्थित काम करत आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाने टोल दरांना आधीच मंजुरी दिली आहे. जोपर्यंत संपूर्ण एक्स्प्रेस वे सुरू होत नाही तोपर्यंत 2.19 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारला जाणार आहे.
एक्स्प्रेस वेवर हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप उभारण्याचं काम सुरु..
दिल्ली ते मुंबई या द्रुतगती मार्गाची एकूण लांबी 1380 किमी आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्गाच्या दिल्ली प्रादेशिक कार्यालयांतर्गत हरियाणा आणि राजस्थानच्या सीमेवर सुमारे 276 किमी लांबीचा द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल. ईस्टर्न आणि वेस्टर्न पेरिफेरल्सला जोडणाऱ्या लूपवर काही रॅम्पचे काम बाकी आहे. यासोबतच एक्स्प्रेस वेवर हॉटेल्स, ढाबे, पेट्रोल पंप उभारले जात असून, त्यांचे बांधकाम सुरूच राहणार आहे.
टोल आपोआप कापला जाणार..
वाहन न थांबवता FASTag द्वारे टोल वसूल केला जाणार असून यासाठी संपूर्ण एक्सप्रेसवेवर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (ANPR) कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे चालत्या वाहनातील FASTag आणि नंबर प्लेट स्कॅन करतील. यानंतर, विहित अंतरानुसार FASTag वॉलेटमधून टोल कापला जाईल. विशेष बाब म्हणजे हरियाणातील गुरुग्राम, सोहना, नूह, मेवात आणि राजस्थानमधील अलवर आणि डोसा जिल्हे आणि शहरे थेट एक्स्प्रेस वेद्वारे जोडली जाणार आहे.
हरियाणा आणि राजस्थानची प्रमुख शहरे एकमेकांना जोडली जाणार..
दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस वेची लांबी 1380 किमी आहे.
पहिल्या टप्प्यात 276 किलोमीटरचा द्रुतगती मार्ग खुला करण्यात येणार आहे.
हा 8 लेन एक्सप्रेसवे असून पुढे 12 लेनचाही होणार आहे.
प्रति किलोमीटर 2.19 रुपये टोल आकारला जाईल
गुरुग्रामचे सोहना, नूह, मेवात, अलवर आणि दौसा शहरांना जोडला जाणार आहे.
ईस्टर्न और वेस्टर्न एक्सप्रेसवेला जोडणार जाणार आहे.
दौसाला 3.30 तर जयपूरला 5 तासात पोहोचता येते.
एक्स्प्रेस वेवर वाहन न थांबवता फास्टॅगद्वारे टोल घेतला जाणार आहे.