दिल्ली ते मुंबई फक्त 12 तासांत..! ‘या’ 6 राज्यांतून पार होणार 1,390 Km अंतर, मुंबईतील JNPT होणार प्रवासाला सुरुवात, पहा रोडमॅप..
आता दिल्लीहून जयपूर आणि दौसाचा प्रवास तुम्ही फक्त 2 तासांत पूर्ण करू शकणार आहे. हे सर्व दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या सुमारे 220 किलोमीटरच्या पट्ट्यातून शक्य होणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 12 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, दिल्ली – मुंबई कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर केवळ 12 तासांत दिल्लीहून मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे.
12 लेनचा पहिला एक्सप्रेस – वे :-
हा एक्सप्रेस – वे सध्या 8 -लेन असून तो कालांतराने तो 12 लेनचा होणार असून त्या प्रमाणे जमीन अधिग्रहण प्रक्रियाही पूर्ण केली आहे. त्यावर ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहने धावू शकणार आहे.
सोहना रोडवर या ठिकाणाहून होणार प्रवेश..
जर तुम्हाला दिल्लीहून जयपूर किंवा दौसाला जाण्यासाठी या कॉरिडॉरचा वापर करायचा असेल, तर प्रथम तुम्हाला धौला कुआन येथून राष्ट्रीय महामार्ग 8 मार्गे गुडगावमधील राजीव चौक गाठावे लागणार आहे. त्यानंतर एक्झिट क्रमांक 10 वरून सोहना रोडवर आल्यावर दोन टोल टॅक्स फ्लाईओवर लागतील. यानंतर तुम्ही दिल्ली मुंबई कॉरिडॉरसाठी डाव्या बाजूला वळून प्रवासासाठी जाऊ शकता.
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, सध्या या ठिकाणाहूनच प्रवेश करता येणार आहे, नंतर आणखी एक्झिट पॉईंट बनवण्यात येणार आहे. म्हणजेच हा कॉरिडॉर सोहना येथून सुरू होणार असून, आता फक्त सोहना ते दौसापर्यंतचा रस्ता सुरू होणार आहे.
जयपूरसाठी कुठून होणार प्रवेश..
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कॉरिडॉरवर 180 किलोमीटर गेल्यानंतर जयपूरला जाण्यासाठी लिंक रोड बनवला जात आहे. तो पूर्ण होताच दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी फक्त 2 तास लागणार आहे. दिल्ली मुंबई कॉरिडॉर केवळ दिल्ली राजस्थानमधूनच नाही तर गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातूनही जाणार आहे. अधिकार्यांचा असा विश्वास आहे की, या एक्सप्रेस – वेमुळे भोपाळ, उज्जैन, अहमदाबाद, इंदूर, अजमेर, कोटा, चित्तौडगड चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे.
दिल्ली – वडोदरा मुंबई एक्सप्रेस वे कुठून ?
विशेष म्हणजे, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग सुमारे 1,380 किलोमीटर लांबीचा आहे. सध्या तो सुमारे 8 लेनचा आहे, जे 12 पर्यंत वाढवला जाणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने टोल फ्री क्रमांक 1033 जारी केला आहे.
पलवलमधील एमपीला एक्सप्रेस वे जोडण्यात आला आहे. दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेवर जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे गुडगावचा राजीव चौक, आणि येथून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर सोहना येथील अलीपूर इंटरचेंजवरून मुंबईसाठी एंट्री देण्यात आली असून हा मुंबईतील (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) JNPT येथील शेवटचा थांबा असणार आहे, येथून मुंबईतील रस्त्यांना कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. हिलालपूर येथे सुमारे 12 किलोमीटर अंतरावर 24 लाइनचा टोल प्लाझा आहे, ज्यावर ही यंत्रणा बसवली जात आहे.
2018 मध्ये झाली होती पायाभरणी..
9 मार्च 2019 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 8 – लेन दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्गाची पायाभरणी करण्यात आली. एक्सप्रेसवेचा सर्वाधिक भाग गुजरातमध्ये येतो 426 किमी. यानंतर राजस्थानमध्ये 373 किमी, मध्य प्रदेशात 244 किमी, महाराष्ट्रात 171 किमी आणि हरियाणामध्ये 129 किमी आहे.