मुंबई : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा आसूड कडाडला आहे.
सोमवारी मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघणार आहे. अखिल भारतीय किसान सभेनं पुकारलेल्या या मोर्चात राज्यभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथून पायी निघालेलं शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत कोणत्याही क्षणी धडकण्याच्या मार्गावर आहे.
सुमारे 20 हजार शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या असून मुक्काम करत करत हे सर्वजण मुंबईच्या आझाद मैदानात येत आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा मोर्चा होणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. किसान मोर्चावर ड्रोनची नजर असणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 100 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 500 हून अधिक पोलीस शिपाई रस्त्यावर असणार आहेत.
शुक्रवारपासूनच पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे. येणारी वाहणं तपासून ती शहरात सोडली जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शेती news, यशोगाथा, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान या विषयक update मिळवण्यासाठी आमचा 8055030606 हा न तुमच्या व्हाट्सएप ग्रुप ला add करा
- 32 दुष्काळी गावांसाठी मोठा दिलासा ! ‘साकळाई उपसा सिंचन योजना’ला मंजुरी..
- Government Schemes For Farmers : प्रत्येक शेतकऱ्याला सरकार कडून दरवर्षी ३६ हजार रुपये पेंशन; असा करा अर्ज
- PM Awas Gramin List 2025 : घराचे स्वप्न साकार होण्यासाठी 15 जून अखेरची संधी ; आवास प्लस 2024 मोबाईल ॲपद्वारे अशी करा नोंदणी .
- MHADA Konkan Lottery 2025 : जुलैमध्ये 4000 घरांसाठी लॉटरी! ठाणे – कल्याणमध्ये 1 BHK फ्लॅट फक्त 17 लाखांपासून पुढे..
- महाराष्ट्र हवामान अपडेट ! राज्यातील 12 जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती..