खरीप पीकविमा 2022 च्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचं अपडेट हाती आलं आहे. ज्यामुळे आता खरीप पिक विमा 2022 च्या संदर्भातील प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. खरीप पिक विमा 2022 साठी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढण्यात आली होती. अशाच काही जिल्ह्यांमध्ये पिक विम्याचे वाटपही झालेलं होतं तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पिकविम्याचे वाटप होणे बाकी होतं.
याप्रमाणे राज्यामध्ये शेतकऱ्यांकडून जे क्लेम करण्यात आले होते त्या क्लेमपैकी जवळजवळ 10 ते 12 लाख क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याचे वाटप होणे बाकी होतं. याबाबतीत पाठपुरावा केला असता, पिक विमा कंपनीकडून राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा निधी अद्याप वितरित झाला नसल्याची माहिती देण्यात येत होती.
आता यावर तोडगा काढत 13 जानेवारी 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन या योजने करता 724 कोटी 50 लाखापेक्षा जास्त निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.
मित्रांनो आपण यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्या हप्त्यापोटी 872 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित निधीची प्रतीक्षा होती. हाच उर्वरित निधी वितरित करण्यासाठी आज 13 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय घेऊन पिक विमा कंपन्यांना उर्वरित निधी वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे अशा, बजाज अलायन्स, एचडीएफसी आग्रो, एआयसी ऑफ इंडिया, युनायटेड इंडिया या कंपन्यांच्या माध्यमातून 724 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये क्लेम झालेले व अधिसूचना काढलेले जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या पिक विमा वाटपासाठी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून साधारणपणे 2450 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करावी लागेल अशी माहिती शासनाला देण्यात आली होती. आणि याच पार्श्वभूमी पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1500 ते 1600 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते.
तरीसुद्धा आणखी 500 ते 600 कोटी रुपयांचे वितरण होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. आता मात्र पिक विमा कंपनीकडे निधीची उपलब्धता झाल्यामुळे या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.