शेती शिवार टीम : केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी मुंबई येथे येऊन आंदोलन करणार आहेत . या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या विराट मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे.
या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. या मोर्चाद्वारे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
मुंबईमध्ये आलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
शेती news, यशोगाथा, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान या विषयक update मिळवण्यासाठी आमचा 8055030606 हा न. तुमच्या व्हाट्सएप ग्रुप ला add करा
- 32 दुष्काळी गावांसाठी मोठा दिलासा ! ‘साकळाई उपसा सिंचन योजना’ला मंजुरी..
- Government Schemes For Farmers : प्रत्येक शेतकऱ्याला सरकार कडून दरवर्षी ३६ हजार रुपये पेंशन; असा करा अर्ज
- PM Awas Gramin List 2025 : घराचे स्वप्न साकार होण्यासाठी 15 जून अखेरची संधी ; आवास प्लस 2024 मोबाईल ॲपद्वारे अशी करा नोंदणी .
- MHADA Konkan Lottery 2025 : जुलैमध्ये 4000 घरांसाठी लॉटरी! ठाणे – कल्याणमध्ये 1 BHK फ्लॅट फक्त 17 लाखांपासून पुढे..
- महाराष्ट्र हवामान अपडेट ! राज्यातील 12 जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती..