शेती शिवर : तुम्ही SBI चे कर्जदार असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी SBI कडून कर्ज घेतले असेल आणि ते थकीत असेल तर ही बातमी तुमच्या साठी महत्वाची आहे.
कोरोना मुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार ने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पण करोना मुळे सरकारही अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर SBI शेतकऱ्यांसाठी सुखद धक्का दिलाय.
बँकेने थकीत कर्जदारांची one time settlement scheme आणली आहे. यामध्ये जर तुमचे थकीत कर्ज २ लाखांच्या पुढे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. या योजने अंतर्गत तुम्हाला फक्त १०% ते २०% रक्कम भरावी लागेल किंवा तुम्हाला व्याजात सवलत मिळू शकते.
अजूनही बँकेचा कॉल किंवा sms आला नसेल तर त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधा या योजनेची शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे.