Take a fresh look at your lifestyle.

Onion Price : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा; आठवडाभरात कांदा पोहचणार 70 रुपये किलोपर्यंत, नाफेडनेही 15 सप्टेंबरनंतर..

0

या वाढत्या महागाईमुळे लोक निश्चितच एक ना एका गोष्टींमुळे चिंतेत आहेत. आता लोकांना टोमॅटोपाठोपाठ कांद्याची चिंता सतावत आहे कारण लवकरच कांद्याचे भावही गगनाला भिडणार आहे, पण मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहे. जवळपास साठ टक्के कांदा खराब झाल्यामुळे आवक घटली आहे. त्यामुळे कांद्याचा तुटवडा जाणवू लागल्याने कांद्याच्या भावात मोठी सुधारणा होत आहे. (Onion Price Hike)

तसेच सध्या पावसाळा सुरू असल्याने लोक कांद्याचा वापर कमी करत आहेत. हंगाम संपताच कांद्याच्या भावात झपाट्याने वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यामुळे सध्या कांद्याला मागणी कमी असली तरी टोमॅटोप्रमाणेच कांद्याबाबतही येत्या काही दिवसांत लोकांचे लक्ष लागून राहणार आहे.

सध्या सर्वच किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव उतरले आहेत. मात्र टोमॅटोचे भाव उतरताच कांद्याचे भाव वाढताना दिसत आहेत. कांद्याबाबत सांगितले जात आहे की, गेल्या काही दिवसांपासून त्याचा वापर कमी होत आहे. घाऊक बाजारात मुंडेरामध्येही गेल्या महिन्याच्या तुलनेत नाशिक आणि मध्य प्रदेशात येणाऱ्या कांद्याचा पुरवठा मागणीनुसार होत नसल्याने कांद्याचे भाव 100 रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतात..

बाजारात कांद्याचे भाव झपाट्याने वाढणार..

टोमॅटोनंतर आता कांद्याची बारी आली आहे. आता लोकांना कांद्याची फारच चिंता वाटणार आहे. पावसाळ्यामुळे यावेळी कांद्याला मागणी कमी असली तरी पावसाळा संपताच कांद्याचे भाव गगनाला भिडण्याच्या तयारीत आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे दर 30 ते 40 रुपये किलोवर असल्याचे सांगण्यात येत आहे.बाजारातील माहितीनुसार 20 ऑगस्टपर्यंत कांद्याचे दर 60 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतात..

टोमॅटोचे भाव आणखी खाली येणार..

ऑक्टोबरपासून खरीप पीक सुरू झाल्यानंतर कांद्याचा पुरवठा चांगला होईल, त्यामुळे भाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोमॅटोबाबत बोलायचे झाले तर टोमॅटोच्या दरात 60 ते 80 रुपयांनी घट झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आवक वाढली. भाजीबाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने आता दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंदेरा मंडईत टोमॅटोचा भाव 1500 रुपये झाला आहे. या काळात शहरातील किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव अनेक ठिकाणी 100 रुपये किलोपेक्षाही कमी राहिला आहे.

नाफेडकडूनही शेतकऱ्यांना मोठा दिलासा..

दुसरीकडे सरकार आता नाफेडने साठवलेला कांदा बाजारात आणणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत होती. दरम्यान, नाफेडने एक पत्रक काढून 15 सप्टेंबरनंतर कांदा बाजारात विकण्याबाबत निर्णय होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सध्या असे आहेत कांदा दर :- 

दरम्यान काल 14 ऑगस्टला पिंपळगाव बसवंत बाजारपेठेत कांद्याला किमान 700 ते कमाल दर 2856 रुपये होते, सरासरी 2450 रुपये प्रति क्विंटल मिळाले. अमरावती बाजार समितीत किमान 1000 ते कमाल 4000 व सरासरी 2000 इतके प्रति क्विंटल दर सर्वाधिक दर मिळाला. संगमनेर बाजार समितीत किमान 600, कमाल 3101, तर सरासरी 1700 दर मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.