Police Bharti 2022 : अखेर तो GR निघालाचं, राज्यात तब्बल 11 हजार 443 पदांच्या भरतीस मंजुरी, पहा, ‘या’ पद्धतीने पार पडणार भरती प्रक्रिया
शेतीशिवार टीम : 15 ऑक्टोबर 2022 :- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी राज्य शासने एक महत्वपूर्ण आणि दिलासायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्य शासनाने काल 14 ऑक्टोबर 2022 रोजी एक GR काढून 100% रिक्त जागा असलेल्या भरण्यास मान्यता दिली आहे. या GR नुसार राज्यात पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील तब्बल 11 हजार 443 पोलिसांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिस भरती प्रक्रियेची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
कोरोनामुळे राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते. महाविकास आघाडी सरकारमध्येही भरती घेण्यासंदर्भात मोठ्या घोषणा झाल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात GR निघालेला नव्हता. त्यामुळे आता GR निघाल्याने येत्या 2 -3 महिन्यात भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
यामध्ये सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचं शासन निर्णयात नमूद केलं आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी :-
पोलीस भरती प्रक्रियेत ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस भरतीत अधिक – धिक संधी मिळावी म्हणून पोलीस भरतीत बदल करून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना याचा अधिक लाभ झाला होता.
परंतु 2014 नंतर भाजप सरकार आल्याने या प्रक्रियेत बदल करून आधी लेखी परीक्षा घेण्यात आली, त्यानंतर 2019 च्या पोलीस भरती प्रक्रियेत महाविकास आघाडी सरकारने भरती पध्दतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून ग्रामीण तरूणांना पोलिस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल हा हेतू होता. पण, त्याची अंमलबजावणी आता आगामी भरती वेळी केली जाणार आहे.
पात्रता :-
12 पास
महिला उंची :- 155 सेंमी
पुरुष उंची :- 165 सेंमी
उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 25 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष शिथिल)
मैदानी परीक्षेचं कसं असणार स्वरूप :-
मैदानी चाचणीमध्ये पहिल्यांदा धावणे, गोळाफेक, त्याचबरोबर 100 मीटर धावणे, असं या मैदानी चाचणीचे स्वरूप असणार आहे.
पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणी :-
शारीरिक चाचणी (50 गुण) :-
जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे
आवश्यक असेल.
(1) पुरुष उमेदवार गुण
(i) 1600 मीटर धावणे :- 20 गुण
(ii) 100 मीटर धावणे :- 15 गुण
(iii) गोळाफेक :- 15 गुण
एकूण :- 50 गुण
महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी :-
(i) 800 मीटर धावणे :- 20 गुण
(ii) 100 मीटर धावणे :- 15 गुण
(iii) गोळाफेक :- 15 गुण
एकूण :- 50 गुण
लेखी चाचणी (100 गुण) :-
() शारीरिक योग्यता चाचणी मध्येकिमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
लेखी चाचणीमध्ये खालील विषय असणार समाविष्ट :-
(1) अंकगणित ;
(2) सामान्य ज्ञान व चालूघडामोडी
(3) बुध्दीमत्ता चाचणी ;
(4) मराठी व्याकरण.
लेखी चाचणीमध्येविचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल.
लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे इतका असेल.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्येकिमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40%
पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
संपूर्ण नवीन GR वाचनासाठी – येथे क्लिक करा