आत्तापर्यंत 7.15 लाख शेतकऱ्यांनी केली eKYC, ‘या’ दिवशी 50000 रु. होणार खात्यात जमा, सहकार मंत्री अतुल सावेंची माहिती !
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर योजनेचा लाभ येत्या गुरुवार, 20 ऑक्टोबरपासून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे त्याचा शुभारंभ होईल, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.
7 लाख पात्र खातदाराच आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हे पैसे जमा केले जाणार आहेत . याबाबत सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
Panjabrao Dakh: आज पुन्हा “या जिल्ह्यांना” जोरदार पाऊस झोडपणार; पहा 30 ऑक्टोबर पर्यंतचा नवीन हवामान अंदाज
आतापर्यंत सुमारे 7.15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. गुरुवारी मुंबईत होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही मंत्री सावे म्हणाले.
योजनेची कार्यपद्धती :-
या योजनेंतर्गत योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयीकृत बँका , खासगी बँका , ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
या प्राप्त याद्यांचे संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र लाभार्थींची यादी निगमित करण्याची कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल.
पात्र लाभार्थ्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह संबंधित बँकेस तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे उपलब्ध करण्यात येतील.
या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोरच्या विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करून घ्यावे .
आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्याच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर योजनेचा लाभ निर्गमित करण्यात येईल.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निकष काय ?
कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.
या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
सन 2019 वर्षांमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या योजनेस पात्र असतील.
तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.