Take a fresh look at your lifestyle.

Samruddhi Expressway : आता नागपूर ते नाशिक गाठा फक्त 5 तासांत..! 80Km चा ‘हा’ दुसरा टप्पा होणार सुरु, MSRDC च्या संचालकांची माहिती..

0

भारतातील सर्वात हायटेक एक्सप्रेस – वे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्य्याचे 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं 701 किलोमीटर लांबीचा मुंबई – नागपूर समृद्धी एक्सप्रेस – वे प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या एक्सप्रेस – वेवर अनेक प्रगत सुविधा पुरविल्या गेल्या आहेत, ज्यामुळे हा भारतातील सर्वात हाय – टेक एक्सप्रेस – वे असल्याचं बोललं जात असून या एक्सप्रेस – वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

परंतु आता शिर्डी ते मुंबई या अंदाजे 220Km चा दुसरा टप्पा कधी सुरु होणार ? याबाबत प्रवाशांना कमालीची उत्सुकता आहे, यावर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) जॉईंट मॅनेजर डायरेक्टर अनिलकुमार गायकवाड यांनी महत्वाचे अपडेट दिले आहे.

MSRDC ने शिर्डी ते मुंबई या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा वेग वाढवला आहे. शिर्डी ते भरवीर या 80Km एक्सप्रेस – वेचे काम अंतिम टप्प्यात आलं असून आता हा टप्पा मार्च – अखेरीस वाहतुकीस खुला करण्याचे MSRDC ने नियोजन आखलं आहे. हा 80Km चा टप्पा खुला झाल्यास नागपूर ते नाशिक हा प्रवास फक्त 5 तासांवर येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. तसेच मार्च अखेरपर्यंत हा टप्पा खुला झाल्यानंतर भरवीर ते इगतपुरी हा टप्पाही जूनपर्यंत सुरू करण्याचे नियोजन MSRDC ने केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हा एक्स्प्रेस वे 49,250 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला असून आंतरराष्ट्रीय आणि सात देशांतर्गत विमानतळ समृद्धी महामार्गाने जोडले आहे. हा एक्सप्रेस – वे 11 जिल्ह्यांतील 392 गावातून जात आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग मुंबई आणि नागपूरला जोडतो. या एक्स्प्रेस वेवर जनावरांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.या एक्सप्रेस – वे वरून ताशी 120Km वेगाने प्रवास करता येत आहे.

हायवेवर चार्जिंग डिव्हाईस उपलब्ध..

हायवेवर इलेक्ट्रिक वाहनांचीही पूर्ण काळजी घेतली जात असून महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक 40 ते 50Km अंतरावर चार्जिंगची व्यवस्था केली जाणार आहे . हा महामार्ग देशातील पहिला महामार्ग आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत बांधली जात आहे. देशातील सर्वात हायटेक हायवे पूर्णत: तयार झाल्यानंतर मुंबईहून नागपूरला अवघ्या 8 तासांत पोहोचणे शक्य होणार असून, सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 13 ते 15 तासांचा कालावधी लागतो. राज्यातील सर्वात मोठ्या महामार्गावर 300 हून अधिक छोटे – मोठे पूल असणार आहेत. या मार्गावर 240 छोटे पूल, 54 उड्डाणपूल आणि 28 मोठे पूल बांधले जात आहेत. हा महामार्ग राज्यातील 11 जिल्ह्यांतून जाणार आहे.

जाणून घ्या काय आहे खासियत..

समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे.

हा महाराष्ट्रातील 11 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद, शिर्डी आणि नाशिक या प्रमुख शहरी भागातून जातो. या एक्सप्रेस – वे मुळे 14 इतर जवळच्या जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करेल.

त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे.

समृद्धी महामार्ग दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार इत्यादी पर्यटन स्थळांशी जोडला जाणार आहे.

120 मीटर रुंदीच्या या द्रुतगती मार्गावर आठ लेन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास ८ तासांत पूर्ण होणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या प्रत्येक 40 – 50 किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ITMS) बसवण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात शिर्डीशी नागपूर जोडण्यात आले असून, नागपूर ते शिर्डी हा प्रवास कारने 10 तासांऐवजी 5 तासांत करता येणार आहे.

नागपूरहून शिर्डीला जाण्यासाठी 900 टोल भरावा लागणार आहे.

समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वात हायटेक महामार्ग आहे.

त्याच्या इंटरचेंजजवळील 35 – 40 हेक्टर जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून त्यातून 161 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.

समृद्धी महामार्गाची रचना जास्तीत जास्त 150 किमी / तास वेगाने वाहन चालविण्यासाठी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने 8 प्रवासी आसन असलेल्या वाहनांसाठी डोंगराळ नसलेल्या भागात कमाल 120 किमी / ताशी आणि डोंगराळ भागात 100 किमी / ताशी वेग मर्यादा निश्चित केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.