Take a fresh look at your lifestyle.

Successful Farmer : पैठणच्या शेतकऱ्याची जिल्हाभर चर्चा, फक्त 2100 झाडांतून घेतलं 60 लाखांचं उत्पन्न, पहा यशोगाथा..

0

शेती व्यवसाय तसा जरा रीस्कीच व्यवसाय, हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेती करत असताना लहरी हवामानाचा शेतीला नेहमीच फटका बसतो. त्यातही फळबाग उत्पादक शेतकरी विशेषः संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अकाली फळगळ, फळांवर काळे डाग पडणे, कोळशी अश्या रोगांचा आणि अनिश्चित हवामान, बाजारभाव, कधी कमी तर कधी जास्त पाऊस अशा वेगवेगळया समस्यांचा सामना करावा लागतो.

परंतु या सर्व समस्यांवर जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मात करता येते, हे सिद्ध करून दाखवलं आहे पैठण तालुक्यातील आखातवाडा येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव मोटकर यांनी. त्यांनी मेहनतीच्या जोरावर यंदाच्या हंगामात मोसंबीच्या झाडांपासून तब्बल 59,51,000 रुपये उत्पन्न मिळविले आहे. शेतकरी सदाशिव मोटकर यांची 2,100 मोसंबीच्या झाडांची बाग आहे.

लागवडी नंतर घ्यावी काळजी 

शेतकरी मोठ्या जोमात बागेची लागवड तर करतात मात्र त्यानंतर योग्य काळजी न घेतल्यामुळे शेतकऱ्याला मोठा लॉस देखील सहन करावा लागतो. यासाठी शेतकऱ्याने सुरुवाती पासूनच बागेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मोसंबीची लागवड करताना जमिनीची पत, त्यानुसार रोपांची निवड, पाणी व्यवस्थापन, खतांचे नियोजन, रोगांवर नियंत्रण इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. असा सल्ला सदाशिव मोटकर यांनी शेतकऱ्यांना दिला.

खतांचे व्यवस्थापन :-

शेतकऱ्यांनी लागवडीच्या पाचव्या वर्षानंतर आंबे बहार अथवा मृगबहार घ्यावा. आंबे बहारासाठी नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात बागेचे पाणी बंद केले पाहिजे, तर मृग बहारासाठी एप्रिल- मे महिन्यात बागेचे पाणी थांबवावे व झाडांना ताण द्यावा.

बहार धरताना 500 ग्रॅम व्हॅम + 100 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू + 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम + 100 ग्रॅम अँझोस्पिरिलम द्यावे. झाडे ताणावर सोडतांना सेंद्रिय खते एका बांगडीत, तर रासायनिक खते दुसऱ्या बांगडीतून द्यावे.

तसेच मध्यम खोल काळ्या मातीच्या जमिनीत लागवड केलेल्या मोसंबीच्या आंबे बहारातील दर्जेदार फळांच्या अधिक उत्पादनासाठ अन्नद्रव्याची मात्रा जानेवारी महिन्यात पुढीलप्रमाणे विभागून द्यावी. – 40% नत्र (320 ग्रॅम नत्र) + 50 टक्के स्फुरद (150 ग्रॅम स्फुरद) मार्च – 40% नत्र (320 ग्रॅम नत्र) + 50% स्फुरद ( 150 ग्रॅम स्फुरद) मे. – 20% नत्र (160 ग्रॅम नत्र) +50 टक्के पालाश (३०० ग्रॅम पालाश)

कठीण काळात खचून न जाता शेतकऱ्यांनी आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देऊन रासायनिक आणि सेंद्रिय शेतीचा सुवर्णमध्य साधला तर उत्पादनात वाढ होऊन मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो असे मत सदाशिव मोटकर यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.