सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे : अहमदनगर-बीड-धाराशिव-सोलापूरातील शेतकऱ्यांची नावे अन् गट नंबर जाहीर, पहा PDF अन् रोडमॅप..
अरबी समुद्राला बंगालच्या उपसागराबरोबर जोडणारा – मराठवाड्यातील बीड – धाराशिव सारख्या विकासापासून उपेक्षित असणाऱ्या जिल्ह्यांना एक नवा विकासाचा मार्ग दाखवणारा – याचबरोबर शेती उद्योग व्यवसायाला एक नवी चालना देणारा महत्त्वाचा महामार्ग म्हणजे चेन्नई – सुरत ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे..
NHAI द्वारे 1271 किमी सुरत – चेन्नई एक्सप्रेसवे हा गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू यांना जोडण्यासाठी नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कलबुर्गी, कुरनूल, कडप्पा आणि तिरुपती यांच्याकडून जाणारा संरेखन असलेला 6 लेनचा अंशतः प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे.
या महामार्गाचे सुरत ते सोलापूर एकूण 564 किलोमीटर ते सोलापूर ते चेन्नई एकूण 707 किलोमीटर अशा दोन भागात विभागाला असून महाराष्ट्राच्या शेतीसह उद्योग व्यवसायाला एक नवी चालना देण्यासाठी विकासाचा महामार्ग म्हणून आपण या महामार्गाकडे पाहिलं जातं.
सुरतहून नाशिक मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चौरकौठे गावापासून सुरत- चेन्नई राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, राहता, व नगर तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.
या राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अंतर तब्बल 100 Km असणार आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी या राष्ट्रीय महामार्गासाठी अधिसूचना जारी झाली असून पुढील 5 महिन्यांत 850 हेक्टर क्षेत्र भूसंपादित होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 800 कोटींचा मोबदला जमा होणार असल्याचं प्राधिकरणाने सांगितलं आहे.
आता या 4 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची नावे आणि गट नंबर जाहीर झाले आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेच्या माध्यमातून 10 व 17 ऑगस्ट 2022 रोजी सोलापूर 3D तर बीड – तर काल अहमद नगर 3A चे नोटिफिकेशनही प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही आता ही नावे अन् गट नंबर पाहायला मिळणार आहे.
अहमदनगर – बीड जिल्ह्यातील गावांची नावे पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
सोलापूर जिल्ह्यातील जमीनदार मालकांची नावे पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
उस्मानाबाद जिल्ह्यातील जमीनदार मालकांची नावे पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
या संबंधातील नोटिफिकेशन तुम्ही egazette.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकता.
गावांची यादी पहा :-
हा महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरपासून थेट चिंचोली गुरव, तळेगाव, वडझरी, कासारे, लोहारे, गोगलगाव, सदतपूर, हसनपूर, सोनगाव राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्गे – खडांबे, वांबोरी मांजरसुब्बा पुढे नगर शहराजवळील चांदबीबी महालाजवळून बरदरी, सोनेवाडी, पारेवाडी, पारगाव भातोडी, भातोडी पारगाव, चिंचोडी पाटील, आठवड मधून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नांदुर, वाघळूज, बालेवाडी, कुंभेफळ, चिंचोली, शिरपूर, टाकळ अमिया, नायगाव चोऊभा, केळसांगवी, धिरडी, इमानगाव, चिखली, खानापूर, वाळुंज, पारगाव जोगेश्वरी, वाळुंज या गावातून पुढे जामखेड तालुक्यात प्रवेश करेल.
या महामार्गाबद्दल थोडक्यात माहिती :-
हा महामार्ग 6 पदरी नियोजित असून याची रुंदी 70 मीटर असणार आहे, मात्र महामार्गाची जमीन अधिग्रहण हे 100 मीटर साठी होणार आहे.
साधारणपणे डिसेंबर 2025 पर्यंत या रस्त्याचं बांधकाम पूर्ण करण्याचं शासनाचं टार्गेट आहे. यातील सुरत – नाशिक – अहमदनगर रस्ता बांधून पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. यातील सुरत – नाशिक – अहमदनगर या 290.70 किलोमीटर च्या पहिल्या टप्प्यासाठी DPR तयार करण्यात आला आहे.
नाशिक मधून येऊन अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 98.5 किलोमीटर अंतर कापून हा महामार्ग संगमनेर, राहाता, राहुरी, नगर, कर्जत व जामखेड या 6 तालुक्यातून जाणार आहे. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 49 गावातील अंदाजे 1500 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. तर वांबोरी घाटात 30 ते 40 मीटर उंचीचे खांब उभारून हा महामार्ग जाणार आहे.
संगमनेर तालुका :- 13 गावे – 282 हेक्टर जमीन
राहता तालुका :- 5 गावे – 94 हेक्टर जमीन
राहुरी तालुका :- 19 गावे – 428 हेक्टर जमीन
नगर तालुका :- 10 गावे – 256 हेक्टर जमीन
जामखेड तालुका :- 13 गावे 302 हेक्टर जमीन
पुढे जामखेड तालुक्यातून डोणगाव, पाटोदा, अरणगाव, खामगाव, ददसलेवाडी,खांडवी, फक्राबाद, बावी, राजेवाडी,नान्नज,वंजारवाडी, पोटेवाडी, चोभेवाडी मार्गे हा महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात प्रवेश करणार…
ब्रेकिंग बातम्यांसाठी, शेतीविषयक योजना, आर्थिक, ऑटो, बाजारभाव, बिझनेस आयडिया, महामार्ग मॅप, ई. अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेला व्हाट्स ग्रुप वर जॉईन व्हा…