Take a fresh look at your lifestyle.

Vande Bharat Train : नवी वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ मार्गावर धावणार, 5 तासांचा प्रवास फक्त 2 तासात होणार पूर्ण – जाणून घ्या वेळापत्रक..

0

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी खुशखबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आता राजधानी दिल्लीहून ते जयपूरपर्यंत वंदे भारत ट्रेन धावणार आहे.फेब्रुवारीच्या अखेरीस जयपूर ते दिल्ली दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिलं आहे.

दोन्ही शहरांदरम्यान सेमी हायस्पीड ट्रेन सेवा सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे. दिल्ली आणि जयपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा मार्च 2023 पूर्वी सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे.

2023 पूर्वी होऊ शकते सेवा सुरू..

भाजपचे सदस्य रामचरण बोहरा यांनी शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जयपूरच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. 900 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. दिल्ली आणि जयपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा मार्च 2023 पूर्वी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे स्टेशनमध्ये होणार सुधारणा..

मंत्रालय जयपूरमधील सांगानेर रेल्वे स्थानकात सुधारणा करेल, अशी हमीही खासदारांना मंत्र्याकडून मिळाली आहे. जयपूर ते सवाई माधोपूर दरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. चौकाचौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिग्गी – मालपुरा जंक्शन येथे अंडरपास करण्यात येणार आहे.

चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीने सेमी – हाय – स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तयार केली आहे. ती ताशी 180 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. परंतु, रेल्वेची स्थिती आणि इतर परिस्थितींमुळे, ती सध्या केवळ 130 किमी / तास या वेगाने प्रवास करत आहे. दिल्ली आणि जयपूर दरम्यान, सरासरी वेग सुमारे 130 किमी / तास अपेक्षित आहे.

दरम्यान, दक्षिण भारतातील दुसरी वंदे भारत ट्रेन सिकंदराबाद – विशाखापट्टणम ट्रेनही धावण्यास सज्ज आहे. दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली ट्रेन आहे. भारतातील सेमी-हाय-स्पीड ट्रेनचा हा आठवा मार्ग असेल, ज्यामुळे 700 किमी पेक्षा जास्त अंतर कापलं जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.